शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Sindhudurg: आंबोली घाट मोजतोय अखेरच्या घटका, बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:55 PM

ब्रिटिशकालीन पूल झाले जीर्ण, रस्ते गेले वाहून

महादेव भिसेआंबोली (सिंधुदुर्ग) : ब्रिटिशकालीन आंबोली घाट आता शेवटच्या घटका मोजू लागला आहे. बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकांमुळे आणि दुर्लक्षामुळे आंबोली घाट हा अंतिम घटका मोजू लागला आहे. आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन पूल आता जीर्ण झाला आहे. बांधकाम विभागाच्या अनियाेजित कारभारामुळे येथील रस्ते वाहून जात आहेत. ब्रिटिशकालीन गटार न खोदणे, रस्त्याचे गटार न खोदणे, अडू बांध न बांधणे, खासगी मोबाइल टॉवर कंपन्यांना वाटेल तशा केबल घालू देणे, संरक्षक कटडे सुस्थितीत न करणे यासारख्या अनेक चुकांमुळे आंबोली घाट धोक्यात आला आहे.आंबोली घाटाची दहा वर्षांपूर्वीची अवस्था ही खूप चांगली होती असे स्थानिक सांगत आहेत. परंतु गेल्या दहा वर्षात आंबोलीच्या घाटाकडे बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. आंबोली घाटातील ४० फुटाची मोरी याठिकाणी काही दिवसांपूर्वी एक भला मोठा दगड कोसळला होता. हा दगड कोसळल्यामुळे या पुलावर एक खड्डा पडला होता. नेमका या पुलावर हा खड्डा पडल्यामुळे या ब्रिटिशकालीन पुलाला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा खड्डा डांबर किंवा सिमेंट काँक्रीट पेवर ब्लॉग्सच्या साह्याने तो बुजवण्याची गरज होती, जेणेकरून या ब्रिटिशकालीन पुलाच्या खालील भागात एकमेकांत अडकवलेला दगडांमध्ये पाणी न जाता ते सुरक्षित राहील, परंतु याठिकाणी पडलेला हा खड्डा केवळ चिरे आणि मातीने बुजविण्यात येत आहे. ज्यामुळे या खड्ड्यातून पाणी खाली झिरपून या पुलाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.पूल कोसळण्याची भीतीयाबाबत मंत्री दीपक केसरकर यांना स्थानिकांनी कळविले आणि उपाययोजना करण्यासाठी विनंती केल्या आहेत. परंतु बांधकाम विभाग मात्र गांभीर्याने ही गोष्ट घेत नसल्याच्या दिसून येत आहे. याबाबत स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापासून तत्काळ याठिकाणी पेव्हर ब्लॉकस व सिमेंटच्या माध्यमातून हे खड्डे बुजविण्यात आले पाहिजे जेणेकरून ते पाणी पुलाच्या खालील बांधकामास धोका पोहोचू शकणार नाही. तात्पुरती मलमपट्टी ही लगेच उघडत असल्यामुळे खड्डा मोठा होत आहे ज्यामुळे हे पूल कोसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते .

गोवा, कर्नाटक, कोल्हापूर व्यापारी मार्ग ठप्प होण्याची भीतीहे जर पूल कोसळले तर आंबोलीच्या पर्यटनावर मोठे संकट येणार आहे. याशिवाय गोवा कर्नाटक कोल्हापूर हा व्यापारी मार्ग ठप्प होणार आहे. ज्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. सद्यस्थितीत आंबोली घाटातील गटारे सुस्थितीत करणे गरजेचे आहे. तर खासगी मोबाइल कंपन्यांनी दरीमध्ये जाणाऱ्या पाण्याच्या मार्गामध्ये बांधलेले काँक्रीटचे बंधारे फोडून ते पाणी दरीमध्ये जाण्यास मोकळे करणे गरजेचे आहे. अन्यथा आंबोली घाट सुद्धा धोक्यात येणार आहे. याविषयी आंबोली ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापासून आंबोली घाटाकडे यापुढे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा स्पष्ट इशारा येथील पर्यटन व्यवसायिकांनी दिला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन