शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पर्यटनस्थळ आंबोली : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:44 IST

अनंत जाधव  सावंतवाडी : आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे ...

ठळक मुद्देपर्यटनस्थळ आंबोली : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत अपुरे पोलीस दल, मोठे क्षेत्रफळ!

अनंत जाधव सावंतवाडी : आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे क्षेत्रफळ हेही आंंबोलीत क्राईमच्या घटना वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम घाटातील पर्यटनाचा हॉटस्पॉट असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे आंबोली. हे पर्यटन स्थळ गेल्या काही वर्षांपासून क्राईम मिस्ट्रीचा हॉटस्पॉट बनत चालले आहे. या ठिकाणी घडणाऱ्या घटनांनी पोलिसांंपुढची डोकेदुखी वाढत चालली आहे.

आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे क्षेत्रफळ हेही आंंबोलीत क्राईमच्या घटना वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.शांत, सुंदर आंबोलीचा चेहरा अशा घटनांनी बदलत चालल्याने तेथील व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. एकतर आंबोली घाट कोसळण्याच्या घटनांमुळे तेथील व्यावसायिक चिंतेत सापडला असताना सतत बाहेरील गुन्हेगारी डोके वर काढत असल्याने आंबोलीच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली आहे.आंबोलीची बदनामी होेणारी पहिली घटना म्हणजे पंजाब येथील युवकाने तेथील मुलीचा खून करून आंबोलीतील एका लॉजमध्ये केलेली आत्महत्या. त्यानंतर एकामागून एक अशा घटना घडत गेल्या. त्या अद्यापपर्यंत थांबण्याचे नावच घेत नाहीत.त्यातच सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी तशीच एक घटना घडली. ती म्हणजे सांगली येथील मोबाईल चोरीच्या घटनेतील संशयित आरोपीला आंंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर पोलिसांंनी आणून जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर आंबोलीची संपूर्ण राज्यात बदनामी झाली.ही घटना सांगलीची असली तरी कृत्य आंबोलीत केल्याने आंबोलीची बदनामी झाली. त्यानंतर गडहिंग्लज येथील शिक्षकाची हत्या असो किंवा साखर वाहतूक करणाºया ट्रकवर दरोडा घालून ट्रक चालकाला आंबोलीत आणून खून केल्याचा प्रकार असो या घटना सतत घडत गेल्याने आंबोलीची सर्वत्र बदनामी झाल्याचे दिसून येत आहे.

त्यातच गेल्यावर्षी आंंबोली येथील घाटात असाच महिलेचा मृतदेह मिळाला होता. पण त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. आता चार दिवसांपूर्वी नव्याने आणखी एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने या घटनेचा तपासतरी लागतो का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.सततच्या घटनांमुळे आंबोलीत बाहेरून पर्यटक जायचे की नाही याचा विचार करीत असतो. त्यातच आंबोलीत नैसर्गिक पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. खरे पण सरकारकडून सतत होणारा दुर्लक्ष यामुळे आंबोलीचे पर्यटन मागे पडत चालले आहे.पेट्रोलिंगवर भर देणार : शशिकांत खोतआंंबोलीतून खाली येणारी प्रत्येक गाडी तपासणी केल्यानंतरच खाली येते. मात्र, कोणी रात्रीच्या वेळी अशा घटना घडवित असतील तर घाटात रात्रीच्यावेळी पेट्रोलिंगही वाढवावे लागणार आहे. तसेच आंंबोलीचा परिसर मोठा असल्याने तेथे वाढीव पोलीस बळही दिले जाईल, असे मत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी व्यक्त केले आहे.आंबोली, चौकुळ, गेळे हा परिसर क्षेत्रफळानुसार तसा मोठा आहे. मात्र, अपुरे पोलीस दल असल्याने पोलीस लक्ष तरी देणार कुठे? असाच प्रश्न पडतो. त्यामुळे आंबोलीची बदनामी रोखायची असल्यास आंबोलीला नव्याने पोलीस ठाणे मंजूर करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत आंबोलीत अतिरिक्त पोलीस दल देणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेरील गुन्हेगारी आंबोलीची पर्यायाने सिंधुदुर्गची डोकेदुखी अशी वाढवित राहणार आहे.गुन्हेगारी घटनांनी पर्यटनाला बाधासतत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आंबोलीच्या पर्यटनाला बाधा आणणाऱ्याच आहेत. आंबोली येथे सांंगली येथील घटनेनंतर दूरक्षेत्राऐवजी पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. पोलीस अधीक्षकांनी तसा प्रस्ताव शासनाकडेही पाठविला होता. मात्र, अद्यापपर्यंत आंबोलीसाठी नवे पोलीस ठाणे मंजूर झाले नाही.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPolice Stationपोलीस ठाणेsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन