शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:25 IST

road safety Pwd Sindhudurg- सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार महादेवाचे केरवडेत ग्रामस्थांची बैठक

माणगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग व कोल्हापूरला सर्वात कमी अंतराने जोडणारा भैरीची पाणंद हा शिवकालीन घाट कुडाळ तालुक्यातील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यांच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव दरम्यान आहे. केवळ साडेचार किलोमीटर अंतराच्या या घाटाला चालना देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन महादेवाचे केरवडेतील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर केले होते.यावेळी हा घाटमार्ग दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आता निर्णायक व आरपार लढा देण्याचे ठरले. यावेळी व्यासपीठावर किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, दादा बेळणेकर, श्याम पावसकर, सुभाष भिसे, तुषार परब, एकनाथ केसरकर, साई नार्वेकर, बाळ केसरकर, अजित परब, श्रीकृष्ण नेवगी, नारायण लोहार, शंकर कोराने, कृष्णा पंदेरे, राजन गुरव, रामचंद्र कदम, विश्रांत केसरकर आदी उपस्थित होते. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला माणगाव खोऱ्यापुरता मर्यादित असलेल्या या लढ्यात आता राजू मसुरकर व सुनील दुबळे यांच्या माध्यमातून सावंतवाडी व वेंगुर्ला हे तालुकेही उतरले आहेत.सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर सध्या अस्तित्वात असलेल्या आंबोली, फोंडा, करूळ, भुईबावडा घाट मार्गांपेक्षा या घाटामुळे ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतरही ५५ किलोमीटरने कमी होणार आहे.हा घाटमार्ग शिवकालीन पाणंद म्हणून परिचित आहे तसेच वसोली ग्रामपंचायतीत हा मार्ग २६ नंबरला यापूर्वीच नोंद केला आहे. याच मार्गाने ब्रिटीश काळात वेंगुर्ला बंदरात व्यापार चालत असे. या घाटाचे अंतर केवळ साडेचार किलोमीटरचे असून, घाटात केवळ एकमेव वळण लागते आणि एक किलोमीटर अंतराचा रस्ता आंजिवडेवासीयांनी श्रमदानातून तयार केला आहे.गत सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या घाटाच्या सर्वेक्षणात अंदाजे खर्च ३२ कोटी रुपये इतकाच दाखविला आहे. त्यामध्ये एक मोठे वळण व चार-पाच लहान मोऱ्या निर्धारित केल्या आहेत. ही पाणंद शिवकालीन असल्याने वन खात्याने वीस फूट रुंदीचा मार्ग माथ्यापर्यंत झाडेझुडपे तोडून साफ केला आहे.घाट अस्तित्वात आल्यास होणारे फायदेया घाटामुळे सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर ११५ किलोमीटर तर वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतर १२५ किलोमीटर होणार आहे. माणगाव येथील प्रख्यात दत्त मंदिर, टेंबे स्वामी जन्मस्थळ, महादेवाचे केरवडेतील सिध्द महादेव मंदिर, मोरे येथील स्वप्ननगरी, ऐतिहासिक रांगणा व मनोहरमन संतोषगड, पाटगाव येथील मौनी महाराजांचा मठ, तांबालेचा महिला साखर कारखाना, गारगोटी येथील मौनी विद्यापीठ, भुदरगड, आदमापूरचे बाळू मामा, वेंगुर्ला बंदर, शिरोडा बंदर, चिपी विमानतळ, झाराप रेल्वे जंक्शन आदी असंख्य ठिकाणे व पर्यटनस्थळे यामुळे जोडली जाणार आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग