शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
2
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
3
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
4
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
5
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
6
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
7
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
8
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
9
एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
10
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
11
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
12
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
13
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
14
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
15
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
16
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
17
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
18
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
19
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 31, 2022 5:25 PM

उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटला असला तरी ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील लाखो चाकरमानी वेगवेगळ्या वाहनांतून घरी दाखल झाले आहेत. मात्र, खड्ड्यांची समस्या त्यांची पाठ सोडत नाही. या खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पांना घरोघरी आणण्यात आले आहे. रस्त्यांची झालेली वाताहात, लोकांसमोर असलेले हे विघ्नं दूर करण्याची प्रार्थना विघ्नहर्त्याला घालावी लागत आहे.मालवण तालुक्याचा विविध भाग, कुडाळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते, कणकवली तळेरे ते वैभववाडी मार्ग, कणकवली तालुक्यातील कनेडी, नाटळ, सांगवे मार्गावर, फोंडा मार्गावर, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, दाणोली, आंबोली मार्गावर, दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भाग असे सर्वच ग्रामीण भागातील रस्ते उखडून गेले आहेत.

धक्के खात गावातग्रामीण भागातील रस्तेही खड्डेमय झाल्याने गावापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सवासाठी गावी न आलेले मुंबईकर यंदा जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र, उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे.

रस्त्यावर जागोजागी तळेयावर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी तळे साचले. कोट्यवधीचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्ती केली जात नाही. मग या निधीचे काय केले जाते, कोणत्या कामासाठी निधी खर्च होतो, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोट्यवधींचा निधी जातो कुठे ?पावसाळ्यात हे खड्डे भरले जात नाहीत. खड्ड्यांभोवती जमा झालेली खडी, वाळूही हटवली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहेत. ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. मग  कोटींचा निधी कुठे खर्च केला जातो, असा प्रश्न केला जात आहे.

मालवण तालुका खड्ड्यात हरविलामालवण तालुक्यातील बेळणे, राठीवडे, पोईप, विरण, बागायत मार्गे बिळवस, महान, आडारी रस्त्यावर बहुतांश भागात रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. आचरा, वायंगणी, हडी मालवण या मार्गाची तशीच अवस्था आहे. कणकवली आचरा मागर्गावरील बराचसा भाग खड्ड्यांनी व्यापला आहे. कुणकवळे, चाफेखोल, गोळवण, वडाचापाट म्हणा किवा चाैके आबंडोस माळगाव या मार्गावरही रस्तेच खड्ड्यात हरविले आहेत.

घाटरस्ते बनले बेभरवंशीसिंधुदुर्गात येणारे आंबोली, गगनबावडा (करूळ) किवा फोंडा या तिन्ही घाटमागर्गावरील रस्ते बेभरवंशी आहेत. याठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका तर आहेच. परंतु या घाटरस्त्यांना जोडणारे सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायबआधीच रस्ते नादुरुस्त झालेले असताना धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी होत असली तरी जिल्हा परिषदेकडे निधीच नसल्याने रस्ते दुरुस्त कसे होणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक