शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

By सुधीर राणे | Published: May 04, 2023 4:54 PM

सत्तेसाठी लाचार झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला

कणकवली: बारसू येथे मोठा घातपात होण्याची शक्यता आहे, जिलेटिन स्फोटके येत आहेत' असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. केवळ उद्धव ठाकरे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटण्यासाठी बारसू येथे येत असल्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी हे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे नीलेश राणेंची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी  खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.कणकवली विजय भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.सत्तेसाठी रिफायनरी प्रकल्पाची दलालीविनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटणार आहेत. जे उदय सामंत आणि राणे कुटुंबीय विनाकारण काळ्या मांजरीप्रमाणे या दौऱ्याच्या आडवे येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची लफडी पुढील काळात बाहेर काढणार आहे. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, रिफायनरी हा प्रकल्प कोकणातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्यामुळे माझा त्याला विरोध असणार आहे. मात्र, आता सत्तेसाठी लाचारी झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.नीलेश राणे उच्च स्तरीय चौकशी व्हावी बारसू परिसरातील ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांची वेदना ऐकण्यास उद्धव ठाकरे ६ मे  रोजी तिघे जाणार आहेत. त्यावेळी सर्व गावांतील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ येणार आहेत. लोक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांना भेटणार म्हणून भाजपाच्या काळ्या मांजरानी जिलेटीन स्फोटकांचा साठा आणि घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. नीलेश राणे यांच्याकडे स्फोटकांची सखोल माहिती असेल तर त्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी.

४३ लोकांची सरकारने तडीपारी केलीआता त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त असून स्थानिक, जनता सायकल देखील नेऊ शकत नाही. नीलेश राणे आणि भाजपचे लोक या रिफायनरीची दलाली करीत आहेत. त्यादृष्टीने पोलिस अधिक्षकांनी याची दखल घ्यावी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष जावून स्थानिकांशी अद्याप संवाद साधन्याची हिमंत केलेली नाही. तेथील ४३ लोकांची सरकारने तडीपारी केली आहे, असा आरोप खासदर राऊत यांनी यावेळी केला.

उदय सामंतांकडून कोट्यवधीचा भ्रष्टाचार उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यापासून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करत आहेत. रत्नागिरीत ६० कोटीच्या त्यांच्याच कंपनीने केलेला रस्त्यावर आता १०० कोटीचा सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मुळात पाच वर्ष देखभाल दुरुस्ती त्या कंपनीकडे असताना हा प्रस्ताव कशासाठी?आम्हाला धमक्या दिल्या आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्याचे उद्योग मंत्री ग्रामस्थांशी संवाद साधन्यासाठी गेले नाहीत. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यांची चौकशी लावा. रिफायनरी होवो अथवा न होवो. पण लोकांचे डोके फोडायचे असा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.रिफायनरीला विरोध नाही, पण.. - वैभव नाईक जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणाहून  राणेंना हाकलून लावण्यात आले. हे लोकांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे बारसू येथे येणार आहेत. त्यांना कोण अडविण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना त्याच पध्द्तीने उत्तर देणार आहे. मोर्चा काढला तर शिवसेना तेवढ्याच ताकदीने उत्तर देईल. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही गप्प बसणार नाही. रिफायनरीला आमचा विरोध कधीही नाही. आमचे म्हणणे आहे की, तेथील लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करा. आम्ही लोकांसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांना बारसू येथे येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Vinayak Rautविनायक राऊत Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प