शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:18 IST

bjp, vengurla, farmar, sindhdurgnews परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी वेंगुर्ला तहसीलदारांना निवेदन

वेंगुर्ला : परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल घेऊन शासनाकडे पाठवावा. तसेच प्रतीगुंठा १०० रुपये तुटपुंजी नुकसान भरपाई किमान प्रतीगुंठा ५०० रुपये करण्यात यावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभापासून अनेक लाभार्थी वंचित आहेत. तो लाभही तत्काळ देण्यात यावा. गेल्यावर्षी नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या सातबाऱ्यास सरकारकडून पैसे घेतले जात नव्हते. परंतु आता सातबारासाठी शासन पैसे घेत आहे ते शासनाने बंद करावे.या गोष्टींचा शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावा व केवळ घोषणा न करता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत करावी. अन्यथा शासनाविरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापू पंडित, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, किसान मोर्चा उपाध्यक्ष मकरंद प्रभू, सरचिटणीस सत्यवान पालव, चिटणीस अपर्णा बोवलेकर, रामचंद्र गावडे, प्रकाश बांदवलकर, विनय गोरे, शांताराम तेली, दशरथ गडेकर, संदीप खोत, भूषण बांबार्डेकर इत्यादी किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरीVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनTahasildarतहसीलदार