शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:53 IST

gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देतेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी मांगवली, वेंगसर ग्रामपंचायतींवर केला दावा

वैभववाडी : निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.येथील भाजप कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, किशोर दळवी, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.काझी म्हणाले, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. परंतु निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या विजयाची श्रुंखला सुरू झाली आहे. तालुक्यातील १०३ पैकी २८ जागा बिनविरोध आल्या असून, त्या भाजपच्या आहेत. मांगवली ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

वेंगसर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागांची निवड बिनविरोध झाली असून, त्या सर्व जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी असून, त्या तारखेपर्यंत भाजपच्या आणखी काही जागा बिनविरोध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित ११ ही ग्रामपंचायतींवर येत्या काळात भाजपचेच वर्चस्व दिसून येणार आहे.पक्षाच्या लोकाभिमुख धोरणामुळे विरोधी पक्षात काम करणाऱ्या अनेकांना भाजपचे आकर्षण आहे. निवडणुकीला इतर पक्षातून उभे राहिलेले अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. परंतु आमच्या पक्षाचे पॅनेल त्या गावात असल्यामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश घेण्यास अडचण झालेली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.धमक्यांना घाबरत नाहीकाही गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या महिला उमेदवारांना विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे धमक्या देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार आहे. आम्ही कुणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. कारण आमचे नेतृत्व सक्षम आहे, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग