शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

कार जाळली, सावंतवाडीतील घटनेचा काँग्रेससह भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:13 IST

महाराष्ट्र स्वाभिमानचे पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभी करून ठेवलेली त्यांची स्वत:ची इनोव्हा कार सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांची कार जाळली, सावंतवाडीतील घटनेने जिल्ह्यात खळबळअज्ञातांचे कृत्य, कारजवळ रॉकेलचा कॅन, दारूची बाटली, चकल्याची पॅकेट

सावंतवाडी : महाराष्ट्र स्वाभिमानचे पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभी करून ठेवलेली त्यांची स्वत:ची इनोव्हा कार सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागल्यानंतर अवघ्या दोन दिवसात हा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण तापले असून, परब यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार जळताना जवळच रॉकेलचे कॅन तसेच दारूची बाटली व चकल्याची पिशवी पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे हे कृत्य मद्यपी व्यक्तीने केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कार जळाल्याने परब यांचे १७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे सोमवारी दिवसभर पक्षीय बैठका तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन खासकिलवाडा येथे आपल्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी आपली कार बिल्डींगच्या खाली उभी करून ठेवली होती.

घरात छोटासा कार्यक्रम असल्याने ते कार्यक्रमात व्यस्त होते. त्याच वेळी बाहेर रात्री १ च्या सुमारास मोठा कसला तरी आवाज झाला म्हणून परब हे बाहेर आले, तेव्हा खाली त्यांची कार जळत होती. कारचा पुढच्या भागाने पेट घेतला होता. त्यामुळे परब यांनी तातडीने अग्निशामक बंब बोलावला. मात्र, घराचा रस्ता चुकल्याने बंब दुसरीकडेच गेला.शहरात गस्त घालणारे पोलीस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आली, मात्र बराच उशीर झाल्याने आगीत पूर्णत: कार जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच जो कोणी कृत्य करणारा असेल त्याला आम्ही सोडणार नाही, असे स्पष्ट केले. घटनेनंतर पोलीस ३५ मिनिटे उशिरा आल्याबद्दल परब यांनी नाराजी व्यक्त केली.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव, हेडकॉन्स्टेबल संतोष हुबे, मंगेश शिगाडे, किरण कांबळी, अर्जुन गवस आदी गस्त घालून आरोपींचा शोध घेत होते.चार वर्षात तिसरी घटनासंजू परब ज्या साई दीपदर्शन इमारतीमध्ये राहतात, त्या इमारतीच्या खाली लावण्यात आलेल्या दुचाकी तसेच आता कार जाळण्याचा हा तिसरा प्रकार आहे. चार वर्षांपूर्वी इमारतीच्या खाली असलेल्या दोन ते तीन दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर परब यांच्या पत्नीची ही दुचाकी जाळण्यात आली होती. त्यातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. त्यातच संजू परब यांची कारच जाळण्यात आल्याने हा गेल्या चार वर्षातील तिसरा प्रकार आहे.घडलेला प्रकार निंदनीयच : बबन साळगावकरसावंतवाडी शहरात गाडी जाळण्याचे प्रकार यापूर्वी कधीही झाले नाहीत. प्रथमच ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडत आहेत. हे कोणी कृत्य केले आहे ते निंदनीयच आहे. असा प्रकार कोणाच्याबाबतही होऊ नये, यासाठी पोलिसांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. त्या शिवाय शहरात पोलीस गस्त वाढवली पाहिजे. असे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. तसेच संजू परब यांच्या घरी जाऊन त्यांची भेटही घेतली. यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर उपस्थित होते.काँग्रेससह भाजपकडून घटनेचा निषेधसावंतवाडी शहरात गाडी जाळण्याचे प्रकार यापूर्वी कधी घडला नाही. पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार घडला. याचा निषेध काँग्रेसचे बाळा गावडे यांनी परब यांची भेट घेऊन केला. तसेच माजी आमदार राजन तेली यांनीही घटनेचा निषेध करत आरोपीवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे तेली यांनी केली आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग