शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

‘महाकबड्डी’साठी खेडही प्रयत्नशील ?

By admin | Published: March 11, 2015 11:22 PM

क्रीडारसिकांना पर्वणी : ‘पशुपतीनाथ ग्रुप’तर्फे होणार स्पर्धेचे आयोजन

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिडा शौकिनांना मे महिन्यात राज्यस्तरीय महाकबड्डी लिग स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशन आणि पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुृप आॅफ कंपनी यांच्यातील चर्चेनंतर या स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे. विशेषत: खेडमध्ये या स्पर्धा घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत़ खेड येथे झालेल्या या संघटनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत सहमती असल्याचे सांगण्यात आले.या स्पर्धा १ ते २३ मेदरम्यान आयोजित करण्यात आल्या असून रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डी संघ पुणे येथील पशुपतीनाथ कंपनीने पुरस्कृत केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष अजय चिंगळे यांच्यावतीने सिध्दार्थ मेहता आणि कंपनीचे संचालक शशांक कदम तसेच सचिन चव्हाण यांनी दिली आहे़ पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुप आॅफ कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य कबड्डी फेडरेशनशी कंपनीची बोलणी झाल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. क्रिकेटच्या धर्तीवर महाराष्ट्रात अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापुर, बारामती, नाशिक, रायगड, रत्नागिरी आदी १२ संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्य, राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हे सर्व संघ पुरस्कुत केलेले आहेत. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना चांगले उत्पन्न कमावण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. कोकणातील लाल मातीतला हा खेळ असल्याने या स्पर्धा कोकणामध्ये झाल्या पाहिजेत, असा आग्रह कंपनीचा असल्याचे संचालक शशांक कदम यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचा संघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नव्हता़ पशुपतीनाथ कंपनीनी हा संघ पुरस्कृत केला आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यांस ७ लाख रूपयांचे पारितोषिक आणि सुवर्णचषक तसेच उपविजेत्यास ५ लाख रूपये आणि सुवर्णचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून लवकरच हा संघ पुरस्कृत करण्याबाबत पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत पशुपतीनाथ कंपनीचे संचालक शशांक कदम, सचिन चव्हाण यांच्यासह सिध्दार्थ मेहता, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद भोसले, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)महिला संघाकडे साऱ्यांचीच पाठरत्नागिरी जिल्ह्याचा पुरूषांचा संघ पुरूस्कृत करण्यात आला असला, तरी आजपर्यंत महिला संघाकडे मात्र साऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा महिलांचा सघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नाही. मात्र, हा संघ पुरस्कृत करण्याच्या प्रतीक्षेत येथील काही उद्योजक आहेत.