शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सावधान आंबोली घाटात कचरा टाकल्यास दंड, सिंधुदुर्ग वनविभागाकडून अंमलबजावणी 

By अनंत खं.जाधव | Updated: June 15, 2024 13:55 IST

दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी आज शनिवार पासून करण्यात येणार आहे.आंबोली घाटात शुक्रवारी वनविभाग तसेच वनसमिती ग्रामस्थ याच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मोठ्याप्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.

सावंतवाडी : वर्षा पर्यटनाच्या पाश्र्वभूमीवर वनविभाग सर्तक झाले असून आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्या ना दणका देण्याचे ठरविले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आंबोली घाटात अस्वच्छता केल्यास किंवा माकडांना खाऊ घातल्यास १ हजार रुपयांचा दंड उपद्रव शुल्क म्हणून वसूल करण्याचे वनविभागाकडून निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी आज शनिवार पासून करण्यात येणार आहे.आंबोली घाटात शुक्रवारी वनविभाग तसेच वनसमिती ग्रामस्थ याच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मोठ्याप्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.हा मोठ्याप्रमाणात साठलेला कचरा बघून सर्वानाच धक्का बसला त्यामुळे वनविभागाकडून यांची गंभीर दखल घेत आंबोली घाटात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना कचरा टाकणारयावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

यात वनविभागाकडून परिपत्रक काढले असून याबाबतची अंमलबजावणी शनिवार 15 जून पासून करण्यात येणार असून यात वनक्षेत्रात जमीन, नद्या, पाणवठे व इतर जलस्त्रोतांचे दूषितिकरण केल्यास कचरा प्लास्टिक टाकताना आढळल्यास १ हजार रुपये दंड वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देणे तसेच वन्य प्राण्यांसोबत छेडछाड करताना आढळल्यास १ हजार रुपये दंड, मद्यपान करणे, मद्यपान बाळगणे १ हजार रुपये दंड आणि धुम्रपान करताना आढळून आल्यास ५०० रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

तर वरील घटना संबंधी व्यक्तींकडून दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास वन नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.हे परिपत्रक उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडून काढण्यात येणार आहे. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforest departmentवनविभाग