शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

जलतरण तलावांतील सायंकाळची बॅच बंद

By admin | Published: October 21, 2015 10:29 PM

पाणीकपातीचा परिणाम : महापालिकेने घेतला निर्णय

नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महानगरपालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात घोषित केल्यानंतर शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांतील पाणीबचतीसाठी सायंकाळची बॅच बंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.पावसाने दिलेली ओढ आणि गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा लक्षात घेऊन भविष्यात पाणीसंकट ओढवू नये, यासाठी महानगरपालिकेने सावधानता बाळगत दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीकपातीच्या घोषणेप्रसंगीच महापौरांनी शहरातील वॉटरपार्क, जलतरण तलाव यांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दि. १३ आॅक्टोबरपासून शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांमध्ये पाणीबचतीचे धोरण अवलंबिले जात असून, केवळ सकाळची बॅच सुरू ठेवत सायंकाळची बॅच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याठिकाणी महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. पाचही जलतरण तलावमिळून सुमारे एक लाख लिटर्स पाणी लागते. याशिवाय जलतरण तलावांमध्ये शॉवर्सचीही व्यवस्था आहे. सुमारे पाच हजार सभासद असून, सकाळ-सायंकाळ बॅचेस चालतात. पाणीकपातीच्या धोरणामुळे आता केवळ सकाळची बॅच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यू. बी. पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

सराव : राज्य-राष्ट्रीय खेळाडूंची मागणी

महापालिकेने पाणीकपातीमुळे सायंकाळची बॅच बंद केल्याने विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला आहे. बव्हंशी खेळाडू हे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सरावासाठी जलतरण तलावांवर येत असतात. मोजक्या संख्येने असलेल्या या खेळाडूंच्या सरावात खंड पडू नये यासाठी त्यांच्यासाठी सायंकाळी जलतरण तलाव खुले ठेवण्याची मागणी संबंधित खेळाडूंनी महापालिकेकडे केली आहे. या खेळाडूंच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती यू. बी. पवार यांनी दिली.