शहरं
Join us  
Trending Stories
1
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
2
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
3
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
4
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
5
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
6
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
7
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
8
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
9
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
10
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
11
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
12
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
13
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
14
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
15
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
16
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
17
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
18
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     
19
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
20
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...

मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीबाबत संभ्रम; तांत्रिक अडचण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 7:26 AM

ओसरगाव, राजापूर, हातिवले टोल नाके आज सुरू होणार?

सिंधुदुर्ग : मुंबई- गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, हातिवले येथील टोल नाके अखेर बुधवारपासून (१ जून) सुरू करण्यात येणार आहेत. या बाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. ओसरगावसोबत राजापूर- हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरू करू नका, असे अनेकांनी म्हटले होते. टोल सुरू केला तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश काम बाकीमुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले टोल नाका परिसरातील काम वगळता इतर बहुतांश काम अपुरे आहे. त्यामुळे तूर्तास टोल सुरू करू नये, यावरून राजकारणही तापले आहे. टोल नाका सुरू होत असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.

भाजपने दिला टोल नाका फोडण्याचा इशारादरम्यान, भाजपचे कणकवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेत, टोलमधून एमएच ०७ म्हणजे सिंधुदुर्ग पासिंगमधील सर्व गाड्यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, ही मागणी पूर्ण न केल्यास टोल नाका फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टोल सुरू कराल तर शिवसेनेशी गाठ : वैभव नाईकमुंबई- गोवा महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. सिंधुदुर्गवासीयांना टोल माफी झालेली नाही, लोकांच्या मागण्यादेखील प्रलंबित आहेत. असे असतानादेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जूनपासून टोल सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. याला नागरिकांचा विरोध असून, जर १ जूनपासून टोल सुरू कराल, तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाsindhudurgसिंधुदुर्ग