शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CoronaVIrus In Sindhudurg : कुडाळ तालुक्यात ७ मे पासून जनता कर्फ्यूचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:06 IST

CoronaVirus Sindhudurg : सद्यःस्थितीत कोरोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय लोकप्रतिनीधी, व्यापारी संघटना प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी याला उत्फूर्तपणे प्रतिसाद देऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अमोल फाटक यांनी केले.

ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात ७ मे पासून जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत मंजुरी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय

कुडाळ : सद्यःस्थितीत कोरोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय लोकप्रतिनीधी, व्यापारी संघटना प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी याला उत्फूर्तपणे प्रतिसाद देऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अमोल फाटक यांनी केले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदार अमोल फाटक यांच्या उपस्थितीत उपाययोजना राबविण्याबाबत कुडाळ तहसील कार्यालय येथे बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, अभय शिरसाट, बनी नाडकर्णी, राजन नाईक, गोविंद सावंत, प्रसाद धडाम, प्रणय तेली, मंदार शिरसाट, बंड्या सावंत, संदीप कोरगावकर, भास्कर परब तसेच व्यापारी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.अभय शिरसाट यांनी केवळ कुडाळ शहर नाही, तर पूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यू केला तरच हेतू साध्य होईल असे सांगितले. नुसतेबंड्या सावंत यांनी सांगितले की, जनता कर्फ्यू आवश्यक आहे. मात्र पोलिस प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये. बँका ही बंद ठेवाव्यात. यावेळी फाठक यांनी सांगितले की, जनता कर्फ्यू हा जनतेने जनतेसाठी पुकारलेला असल्याने त्यामध्ये शासनाचा कोणतीही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे कोणावरही कारवाई केली जाणार नाही.विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई : पाठकया कालावधीत घोटगे, ओरोस, हळदीचे नेरुर, कडावल, पणदुर, कामळेवीर, कसाल, पिंगुळी, नेरुर, आंब्रेड, माणगांव या गावातील ग्रामनियंत्रण समितीचे सदस्य तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील हे विशेष देखरेख ठेवतील व नियमांचे उल्लंघन करणा-या तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे फाटक यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशनTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग