शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

फक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 18:38 IST

Vinayak Raut shivsena Kankavli Sindhudurg-शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देफक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

कणकवली : शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यांचे विविध घोटाळे आम्हाला माहीत असून विनाकारण आमच्या कोणी वाकड्यात शिरले तर त्याला सरळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. कणकवली येथील महाडिक कंपाऊंड परिसरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, कामगार नेते निलेश पराडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, बाळा भिसे, महिला जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, शैलेश भोगले, मिलिंद साटम, रवींद्र जोगल, विलास साळसकर, सुशांत नाईक, गितेश कडू, दिगंबर पाटील, राजू राठोड, प्रथमेश सावंत, हर्षद गावडे आदी उपस्थित होते.विनायक राऊत म्हणाले, उद्याच्या महा विकास आघाडीच्या आमदाराचे हे कार्यालय आहे. विकासाचे शिवधनुष्य उदय सामंत आणि माझ्याकडे आहे. मतदारसंघाशी आमचे घट्ट नाते असून राणेंनी त्यांच्या पदाला शोभेल अशी टीका करावी. तुम्हाला शिवसेनेने मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. उद्धव ठाकरे दुष्मनावर सुद्धा प्रेम करतात. असेही ते म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले, पोपट पंची करणारा माजी आमदार मला शिव्या घालणार असेल तर घालू दे. मात्र , मी रिफायनरीचे समर्थन करणार नाही. आम्ही इनोव्हेशन कोकण योजना आणणार आहोत. मी खासदार झालो तेव्हा चिपी विमानतळाचे १४ टक्के फक्त काम झाले होते. आता काम पूर्णत्वास जात आहे. २५०० रुपयात मुंबईला जाता येणार आहे. तेथून दररोज विमाने विविध ठिकाणी जाणार आहेत.

जिल्ह्यातील पाणी पुरवठा प्रकल्प आहेत त्यांची पाहणी आम्ही करणार असून येत्या तीन वर्षात ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी अरूण दुधवडकर, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, निलम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले.आता पेटून उठले पाहिजेज्यांच्याजवळ विकासाचे काहीच मुद्दे नाहीत ते नुसती टीका करीत आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतीबरोबरच आगामी सर्व निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी आता पेटून उठले पाहिजे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांना सरंक्षण तर मिळेलच. पण , त्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून आम्ही सर्वजण असू ,असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली