शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा

By admin | Published: May 22, 2016 9:12 PM

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा चार वर्षात मोठ्या प्रमाणात घट

सुरेश बागवे -- कडावल  --सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जांभूळ काढण्याचा व्यवसाय या हंगामात मोठ्या प्रमाणात चालतो. पण, अलिकडच्या कालावधीत जांभळाचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी केलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाचा जांभूळाच्या बाबतीत नकारार्थी दृष्टीकोन यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ शेतीला मोठ्या प्रमाणावर उतरती कळा लागल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू उत्पादनाबरोबरच जांभळातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. जांभूळ मधुमेहासारख्या आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे या दुर्लक्षित पिकाकडे व्यापारी दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. मात्र, या पिकावर आता निसर्गानेही आपली वक्रदृष्टी वळविली आहे. गेल्या चार वर्षात जांभळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी तर जांभळाचे उत्पादन अतिशय कमी झाले आहे. झाडावर जांभळे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी जांभळाची निर्यात मंदावली आहे. खुद्द आकेरी गावातून जांभळे अल्प्र प्रमाणात निर्यातीसाठी दाखल होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात जांभूळ या झाडाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे दिसत आहे. आकेरी गाव जांभळासाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून जांभळांची महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर निर्यात होते. आता जांभळाच्या नवीन जाती कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्याचा अभ्यास करून त्याची आंबा, काजूप्रमाणे लागवड करणे आवश्यक आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील कमी झालेले जांभळाचे उत्पादन पुन्हा वाढेल. त्यातून आर्थिक उलाढाल पुन्हा वाढेल, यासाठी शेतकऱ्यांनी आता निसर्गातील झाडांवरच अवलंबून न राहता त्यांची पुनर्लागवड करून त्याकडे त्यादृष्टीने पाहणे गरजेचे आहे. (वार्ताहर)