शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी

By admin | Published: October 23, 2015 9:32 PM

चिपळूण : लियाकत शहा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अडरे : पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाशी फारकत घेऊन राजीनामा न देता स्वतंत्र गट स्थापणाऱ्या राष्ट्रवादीच्या ८ नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सन २०११मध्ये झालेल्या चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ पैकी १२ राष्ट्रवादी, ३ काँग्रेस, ४ शिवसेना, ५ शहर विकास आघाडी असे सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी १२ व काँग्रेस ३ अशी १५ सदस्य संख्या झाल्याने नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सत्ता स्थापन झाली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांच्या निवडीकरिता राष्ट्रवादीच्याच १२ नगरसेवकांपैकी निर्मला चिंगळे, तेजश्री सकपाळ, राजेश केळस्कर, शिल्पा सप्रे-भारमल, आदिती देशपांडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, शहाबुद्दिन सुर्वे व रुक्सार अलवी या ८ जणांनी स्वतंत्रपणे चिपळूण आघाडी या नावाने गट स्थापन केला. या करिता वरिल ८ जणांना कागदोपत्री पक्षातून फारकत घेतल्याचे नमूद करावे लागले तर राष्ट्रवादीचे उर्वरित ४ व काँग्रेसचे ३ मिळून ७ जणांचा राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी नावाने गट स्थापण्यात आला. पक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होवूनही ८ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादी वगळता अन्य कोणत्यातरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर ८ जणांचा गट राष्ट्रवादीचाच म्हणून अजूनही कार्यरत आहे. यावर राष्ट्रवादीतून अथवा विरोधी गटातून कोणतीही विचारणा होत नाही. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून, रत्नागिरी नगर परिषदेतील ४ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर व तांत्रिक कारणास्तव राष्ट्रवादीतील ८ नगरसेवक अपात्र ठरु शकतात, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे. याबाबत शाह यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, नेते यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. नगर पालिकेच्या सत्तेतील सहकारी असूनही आम्हाला मासिक बैठकीकरिताही व्हीप बजावून आमची गळचेपी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)स्वतंत्र गट : राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांबाबत आक्षेपराष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी वेगळा गट स्थापन केला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडणुकीनंतर हा गट राष्ट्रवादीचाच गट म्हणून कार्यरत आहे.चार वर्षानंतरही कोणतीच कारवाई नाही.व्हीप बजावूनही गळचेपी धोरण.कोणत्याही पक्षात विलीन नाही.वरिष्ठ स्तरावरही दखल.पक्षाचे नगरसेवकपक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होऊनही आठ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादीवगळता अन्य कोणत्या तरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता हे नगरसेवक राष्ट्रवादीचेच म्हणून कार्यरत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.