शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नव्हे

By admin | Published: July 06, 2016 11:01 PM

वैभव नाईक यांचा टोला : देवगड येथे शिवबंधन कार्यक्रम

देवगड : वडिलांचा जेथे पराभव करायला आम्हाला वेळ लागला नाही तेथे मुलाचा पराभव करण्यासाठी शिवसेनेला कष्ट करावे लागणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन करतानाच ज्यांना मागील पंचवीस वर्षे जिल्ह्याचा विकास जमला नाही त्यांनी आमच्या दीड वर्षाच्या कालावधीचा आम्हाला हिशेब विचारू नये. कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नाही. शिवसेना मात्र जनतेचाच विकास करीत राहणार आहे, असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देवगड येथे शिवबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुभाष मयेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, हर्षद गावडे, वर्षा पवार, दादा पडेलकर आदी उपस्थित होते. मेळाव्यात पक्षाची मागील ५० वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. नाईक म्हणाले, युतीशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये संघटनात्मक बांधणीबरोबर ही विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून विश्वास संपादन केला पाहिजे. आगामी काळात हा सर्व भाग शिवसेनामय दिसेल. पक्षातील तरुणांनी नव्या उमेदीने काम करायला हवे. शिवसेनेने आजवर सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. जेथे वडिलांचा पराभव केला तेथे मुलाचा पराभव करायला शिवसेनेला वेळ लागणार नाही. पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास सुरू आहे. पर्यटन, रस्ते विकास यासह मच्छिमारांचे प्रश्न सोडवले जात आहेत. मात्र, मागील पंचवीस वर्षांत काहीही विकास न करणाऱ्यांनी आमच्याकडे दीड वर्षातील हिशोब विचारू नये. शिवसेना लोकांच्या कामासाठी सक्रिय व सक्षम आहे. काँग्रेसची स्थापना कोणी केली हे त्यांच्या तालुकाध्यक्षांना तरी माहिती आहे का? असा प्रश्न विचारत मराठी माणसाने निर्माण केलेल्या संघटनेच्या मागे जनता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)