शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

By admin | Published: March 17, 2015 11:45 PM

आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात.

रत्नागिरी : ज्या फळमाशीच्या कारणासाठी युरोपीय देशांनी हापूस नाकारला, ती फळमाशी नष्ट करण्यासाठी हापूसवर उष्णजल प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पातळ सालीच्या हापूसला ही प्रक्रिया सहन होईल का, याबाबतचे संशोधन आंबा-काजू मंडळातर्फे केले जात आहे. अर्थात त्यासाठी प्रथम फळमाशी तयार करण्यापासून संशोधनाला सुरुवात करावी लागल्याने ‘उष्णजल’च्या अहवालासाठी आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे तसेच अहमदाबाद येथील मार्केटमध्ये जिल्ह्यातून आंबा विक्रीस पाठविण्यात येत आहे. आंब्याचे प्रमाण कमी असले तरी दरही समाधानकारक नाहीत. १५०० ते ४००० रुपये इतका पेटीला भाव मिळत आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे भाव असे व्यापारी सांगत असले तरी शेतकऱ्यांचे योग्य दराअभावी नुकसान होत आहेशेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी परदेशात आंबा पाठविला जातो. सध्या आखाती प्रदेश वगळला तर अन्य देशांनी घातलेल्या जाचक अटीमुळे सर्रास शेतकऱ्यांना आंबा विक्रीला पाठविणे शक्य होत नाही. बहुधा एप्रिल, मे मध्येच आंबा परदेशात पाठविण्यात येतो. आंबा काजू बोर्डातर्फे पणन विभागामध्ये याबाबतचे संशोधन केले जात आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)आधी फळमाशीची निर्मितीआंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो; परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम पेरूतून फळमाशी निर्मिती, त्यानंतरच फळमाशीचा आंब्यावरील परिणाम व आंब्यावरील उष्णजल प्रक्रिया, त्याचा फळमाशीवर होणारा परिणाम अशा टप्प्याटप्प्याने संशोधन होत आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राथमिक अहवाल तयार होईल, असे अपेक्षित आहे.