शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:30 IST

कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल.

कणकवली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८२ लाख कोटी रुपयाचे वाटप मोदी सरकारने केले आहे.कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य,स्वतःच्या कोरोना लस निर्माण केल्या,९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे , सुमारे तीस लाख फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करून पुन्हा व्यवसाय उभारण्यात आल्या आहेत. ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या शेकडो योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे असे प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे या अभियानाचे औचित्य साधत कणकवली येथील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , 'सब का साथ, सब का विकास', 'सब का विश्वास आणि सब का प्रयास 'हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या . त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली आहे. वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे .भारतीय अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी

भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले . कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अशी ओळख झाली आहे.

देश मोदींच्या नेतृत्वात महासत्ता बनेलआजची जगातील महागाई पाहता श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ असे देश फारच अडचणीत आले आहेत.त्या मानाने भरतात महागाई खूपच आटोक्यात आहे. कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा अमेरिका, चीनला  मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल. असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस