शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Politics : हा तर नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:51 IST

Politics Sindhudurg : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवायची आता आपल्या वडिलांची राजकीय कुवत राहिलेली नसल्यामुळे ते या सर्वोच्च पदासाठी पात्र नाहीत आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपद भूषविण्यासाठी नारायण राणेंपेक्षा कितीतरी पटीने सरस व सक्षम आहेत, अशी प्रांजळ कबुलीच नीतेश राणेंनी दिल्याचा टोला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देहा तर नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम अतुल रावराणे यांचा टोला : नीतेश राणे यांच्या टीकेला उत्तर

कणकवली : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो ते बघा. असे वक्तव्य आमदार नीतेश राणेंनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी लावलेला पूर्णविराम आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवायची आता आपल्या वडिलांची राजकीय कुवत राहिलेली नसल्यामुळे ते या सर्वोच्च पदासाठी पात्र नाहीत आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपद भूषविण्यासाठी नारायण राणेंपेक्षा कितीतरी पटीने सरस व सक्षम आहेत, अशी प्रांजळ कबुलीच नीतेश राणेंनी दिल्याचा टोला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चक्रीवादळाच्या नुकसानीनंतर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांप्रमाणे दौऱ्यावर कोणतीही वल्गना केलेली नाही. नुकसान झालेल्याचा पूर्ण डाटा घेऊन योग्य प्रकारे भरपाईची घोषणा ते लवकरच करतील.मात्र, हे करतानाच भविष्यात येणाऱ्या वादळांबाबत उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला आहे. समुद्र किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड केबल, धूप प्रतिबंधक बंधारे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पावले उचलली आहेत. दूरदृष्टी असलेला नेता कसा असावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे ज्या कोकणवर शिवसेनाप्रमुखांचे प्रेम होते त्याच कोकणवर मुख्यमंत्र्यांचेही किती प्रेम आहे, ते लवकरच दाखवून देतील आणि नुकसानग्रस्तांचे अश्रूही पुसतील, यात कुणालाही शंका घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.आज देशात सर्वाधिक जीएसटी देणारे राज्य हे महाराष्ट्र असताना येथे झालेल्या नुकसानीबाबत राज्याला झुकते माप देण्याची अपेक्षा होती. मात्र, याही ठिकाणी पंतप्रधानांनी राजकारण केले. हे राजकारण वैफल्यग्रस्त झालेल्यांच्या डोळ्यांना दिसत नाही का? असा सवालही अतुल रावराणे यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत ही हवेत गोळीबार करण्याची नाही, तर ते घोषणा करतात आणि ते काम तत्काळ पूर्ण करतात. त्याच पद्धतीचे काम चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईबाबतही ते करतील. मात्र, जिल्हा दौऱ्यावर आलेल्या व मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेले देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या माध्यमातून वादळ ग्रस्तांसाठी काहीतरी घोषणा करतील, अशी अपेक्षा त्यांच्या नेत्यांना होती. मात्र, त्यांनी जनतेची नाही तर त्यांच्या नेत्यांचीच निराशा केली.

पंतप्रधानांनी गुजरातसाठी १ हजार कोटी दिले त्याबद्दल आम्ही अभिनंदनच करतो. मात्र, हे करत असताना महाराष्ट्राबाबत सापत्नभावाची वागणूक दाखविल्याचा निषेधही करतो, असे रावराणे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेNilesh Raneनिलेश राणे Atul Raverneअतुल रावराणे sindhudurgसिंधुदुर्ग