शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फसगत

By admin | Published: August 20, 2016 10:33 PM

कोकण रेल्वे : अप-डाऊन मार्गावरील गाड्यांचा प्लॅटफॉर्मवरील डबा क्रमांक सारखाच

अतुल कामत -- रत्नागिरी  -रत्नागिरीकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेचे डबे ज्या क्रमांकाने प्लॅटफॉर्मवर लागतात, त्याचक्रमाने मुंबईकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या रेल्वेचे डबे लागतील का? अप आणि डाऊन ट्रेनच्या डब्यांच्या प्लॅटफॉर्मवरील बोगीदर्शक फलकावरील क्रमांक वेगळाच असायला हवा ना... पण चिपळूण रेल्वेस्थानकाने ही करामत करून दाखवली आहे. चिपळूण स्थानकातील दोनही प्लॅटफॉर्मवर बोगीदर्शक फलकावरील क्रमांक चुकीचे लावण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांची मोठी फसगत होत आहे.गाडी स्थानकात दाखल झाली की, आपला डबा कुठे येईल, हे सर्वसामान्य लोकांना कळते ते प्लॅटफॉर्मवर असलेल्या बोगीदर्शक फलकांवरून. स्थानकामध्ये येणाऱ्या रेल्वेत वातानुकुलीत डबा इंजिनपासून कितव्या क्रमांकाचा आहे, जनरलचा डबा कितव्या क्रमांकावर आहे, दुय्यम श्रेणीचा डबा कितव्या क्रमांकावर आहे, याची उद्घोषणा केली जाते. त्यानंतर अनेक लोक प्लॅटफॉर्मवरील बोगीदर्शक फलकावर लिहिलेल्या क्रमांकासमोर जाऊन उभे राहतात. ही सर्वसाधारण पद्धत आहे. त्यामुळे स्थानकात रेल्वे दाखल झाल्यानंतर प्रवाशांची धावपळ होत नाही.मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचे इंजिन सर्वात पहिले असते आणि तेथून डब्यांचे क्रमांक मोजायला सुरूवात होते. जर गाडी त्याच्या उलट दिशेने जाणार असेल तर त्याचे बोगी दर्शक फलकावरील क्रमांक उलटेच असणे आवश्यक आहे. म्हणजेच फलकाच्या एका बाजूला गाडीच्या डब्याचा १ असा क्रमांक असेल तर त्याच्या मागच्या बाजूला २४ असाच असायला हवा. चिपळूण रेल्वे स्थानकाने याच विषयात आपली करामत दाखवली आहे. फलकावर जेथे १ क्रमांक लिहिला आहे, त्याच्या मागील बाजूसही १ असाच क्रमांक टाकण्यात आला आहे.चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी रेल्वे थांबली असेल तर तिचा पहिला डबा जेथे येतो, त्या जागेवर गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेचा पहिल्या क्रमांकाचा डबा येणारच नाही. त्यामुळे उद्घोषणा (अनाऊन्समेंट) ऐकून त्या-त्या क्रमांकावर उभे राहणाऱ्या प्रवाशांची गाडी आल्यानंतर धावपळ होत आहे.सदरची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांना यात काही चूक असल्याचे वाटत नाही, असा धक्कादायक अनुभवही चिपळूण रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना येत आहे.हा घ्या पुरावा!चिपळुणातील रेल्वे स्थानकांवरील हे चित्र! अप आणि डाऊन रेल्वेच्या बाबतीत डब्यांचा क्रमांक तोच टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. अप आणि डाऊनसाठी १३ आणि १४ क्रमांकाच्या डब्याची ही प्रातिनिधिक छायाचित्रे! कोकण रेल्वेने केलेल्या हलगर्जीपणामुळे आरक्षित आणि विनारक्षित दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.