शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

नुकसानीमुळे शेतकरी हवालदील

By admin | Published: March 15, 2015 9:41 PM

जिल्ह्यातील स्थिती : अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे बळीराजा संकटात

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग -कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काजू व आंबा या दोन्ही पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तालुक्यात काजू या पिकावरच अर्थव्यवस्था असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी तरणार आहे. कोकणपट्ट्यात हवामान उष्ण असल्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे कोकणातील खास करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सुखाने जगू शकतो. या पिकांवरच येथील शेतकऱ्यांचे भवितव्य अलवंबून आहे. या पिकांवरच शेतकरी आपले कुटुंब चालवू शकतो. मात्र, हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे या पिकांना फटका बसत आहे. त्यात अवकाळी पावसाने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून टाकले आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे प्रमुख पिकांना फटका बसला. हवामानात सातत्याने दमटपणा असल्याने मिळणारे काजू पीक आता मिळणार नाही. काजू झाडांवरील मोहोर पूर्णपणे करपून गेला असून काजू पीक गळू लागले आहे. बोंडूही वाळू लागले आहेत. पीकधारणा बंद झाली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली, तरच शेतकरी तरू शकणार आहे. काजू, आंबा पिक उत्पादनात घट होणारहजारो कुटुंबे रोजगारापासून वंचित अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. हजारो कुटुुंबे रोजगारापासून वंचित राहणार असून उपासमारीचीही वेळ येणार आहे. काजू पिकावरच काजू युनिट उद्योग अवलंबून आहे. काजूचे उत्पादन घटणार आहे. प्रथमच असे संकट आल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे. - चंद्रशेखर देसाई, उद्योजक, दोडामार्गउत्पादनातील घट व्यावसायिकांना मारककाजू पिकावर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संकट आले आहे. काजू पिकावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. अवकाळी पावसाळीमुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान होणार होते. मात्र, हवामानात दमटपणा असल्याने पाण्याचे थेंब आंबा, काजूच्या मोहोरावर चिकटून राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.- शिला पाटयेकर, काजू व्यावसायिक