शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:36 IST

कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत शासनाचे अनुदान लाटण्यासाठी, बँक कर्ज बुडविण्यासाठी प्रकल्प

कणकवली : कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.कणकवली शहरात ९०० कोटींचा कचरा प्रकल्प उभारला जात आहे. या कचरा प्रकल्पाबाबत शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेत हा प्रकल्प म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप कणकवली येथील विजय भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.यावेळी खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर आदींनी कचरा प्रकल्पावर टीका केली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत म्हणाले, ए.जी.डॉटर्स या कंपनीने दिल्ली गाझियाबाद तसेच पटना आणि कणकवली येथील नगरपालिकांबरोबर कचरा प्रकल्पाबाबत करार केलेले आहेत. मात्र, हा प्रकल्प केंद्र शासनाची सबसिडी आणि बँकांचे कर्ज लाटण्यासाठी केला जात आहे.कणकवली नगरपंचायतीने केलेल्या करारपत्रात या ९०० कोटींच्या कचरा प्रकल्पासाठी नारायण राणे कुटुंबीयांच्या अखत्यारित असलेल्या विविध आस्थापनांबरोबरच इंजिनिअरिंग कॉलेजमधून २ टन, मातोश्री वृद्धाश्रमातून ३ टन तसेच जिल्हा परिषद १२५ टन, दोडामार्ग नगरपंचायत ३ टन कचरा मिळणार असल्याची आकडेवारी समाविष्ट केलेली आहे. एवढा कचरा त्या ठिकाणाहून कसा मिळू शकेल? हे एक मोठे कोडेच आहे.सत्य डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्नकणकवलीवासीयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढेल. त्यामुळे जनतेला त्रास होईल अशी कोणतीही कृती त्यांच्याकडून होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या प्रकल्पाचे सत्य आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत