शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

पक्षभेद विसरून दुष्टप्रवृत्ती विरोधात एकत्रितपणे लढा द्या, सुधीर सावंत यांचे आवाहन

By सुधीर राणे | Updated: June 22, 2024 16:59 IST

कणकवली येथे श्रीधरराव नाईक यांचा ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम

कणकवली: मारामारी, खून हा राजकारणाचा विषय नाही. राजकारणात हे घडत असेल तर त्याला ठेचून काढले पाहिजे. श्रीधरराव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते. त्यांची हत्या करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती विरोधात केवळ वैभव नाईक, सुशांत नाईक यांचा लढा नाही. तर तो आपल्या सर्वांचा आहे. त्यासाठी सर्वानी पक्षभेद विसरून एकत्रितपणे लढा द्या असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले. श्रीधरराव नाईक यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त कणकवली येथे आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, नीलम सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुगंधा साटम, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, मुरलीधर नाईक, अरुण भोगले, संकेत नाईक आदी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, २२ जून हा दिवस आयुष्यात येऊच नये असे आम्हाला वाटते. श्रीधर नाईक यांचे कार्य युवापिढीला समजावे, युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून समाजकार्यात पुढे यावे. त्यासाठी हा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रीधर नाईक हे रंजल्या गांजलेल्यांना मदत करत होते. त्यांची लोकप्रियता वाढत चालली होती. त्यांचे हे यश पचत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली. ते चुकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करत असत. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृति चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी वैभव नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक हे मेहनत घेत आहेत. जिल्ह्याच्या जडणघडणीत नाईक कुटूंबांचे मोठे योगदान आहे. राजकारणातील अडथळा दूर करण्यासाठी श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली.  सध्या राजकारणात सत्तेसाठी पैसे आणि पैशासाठी सत्ता हेच समीकरण चालू आहे. न्याय, मते आणि नेते देखील पैशाने विकत घेतले जात आहेत. जनतेने अशा प्रवृत्ती विरोधात लढले पाहिजे. अमित सामंत, इर्शाद शेख ,विवेक ताम्हणकर, संदीप सरवणकर, नीलम सावंत आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बाळू मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. तर संकेत नाईक यांनी आभार मानले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण