शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

कार्यकर्ते मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी, एकटे केसरकर नाहीत - राजन तेली 

By अनंत खं.जाधव | Updated: June 8, 2024 16:29 IST

राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मताधिक्य, आमदार नितेश राणे यांनी विजयाचे श्रेय केसरकर यांना दिले होते

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले त्याचे खरे श्रेय कार्यकर्त्यांना दिले पाहिजे तेच खरे मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी आहेत. एकट्या दीपक केसरकर यांना यांचे खरे श्रेय कसे? असा सवाल आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावर माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला.तसेच कुणाला उमेदवारी हवी असल्यास पक्षाकडे मागा पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मिळत नाही असा सल्ला ही तेली यांनी संजू परब यांना दिला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार नितेश राणे यांनी या विजयाचे श्रेय दीपक केसरकर यांना दिले होते. त्यावर शनिवारी तेली यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, खरे म्हणजे शिंदे सेना व भाजप एकत्र आल्याने सावंतवाडी मतदारसंघात एक लाख मताचा टप्पा गाठणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. याची कारणमिमांसा केली जाईल पण जी मते पडली त्यामागे तळागाळातील विकास हेच मुख्य कारण आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांची मेहनत ही म्हणावी लागेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणात निधी गावागावात दिला. त्यामुळे लोकांची कामे झाली. पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना निधीसाठी झगडावे लागत होते. पण आता तसे होत नाही असे म्हणत त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.2014 पूर्वी सावंतवाडी तालुक्यात भाजपची एकमेव ग्रामपंचायत निवडून यायची पण आता येथे शतप्रतिशत भाजप असून हे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील यश हे एकट्या दीपक केसरकर यांचे नसून शिंदे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांचे असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राणे निवडून आल्याने आता विकास कामे जलद गतीने होतील रोजगार येतील आम्ही खास करुन आडाळी येथील एमआयडीसीत वेगवेगळे प्रकल्प आले पाहिजेत. लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी आग्रही असणार असून लवकरच या विषयासाठी खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे तेली यांनी सांगितले.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात चांगले मताधिक्य लोकसभा निवडणुकीत झाले पण शहरी भागात आम्ही कामी पडले यांचे मुख्य कारण अप्रचार आहे. तो आम्ही थांबविण्यात कमी पडलो या व्यतिरिक्त आणखी काही कारणे असतील त्याचा  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेऊ असे ही तेली यांनी सांगितले.सावंतवाडी मतदारसंघात रोजगार हा विषय मोठा आहे.आडाळी एमआयडीसीत अत्तर तयार करणारी कंपनी आली असून त्यांनी आपला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ही कंपनी सुरू झाल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRajan Teliराजन तेली Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर