शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला; माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची खंत 

By अनंत खं.जाधव | Published: November 15, 2022 7:27 PM

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला असे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे. 

सावंतवाडी : भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसला जरूर उभारी मिळेल पण थोडा उशीर झाला आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेले. नेतृत्वाने सुरूवातीपासूनच याकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्यामुळे पक्षातील अस्थिरतेचे वातावरण थांबले असते अशी खंत गोवा कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. प्रादेशिक पक्ष संपवणे शक्य नाही. याला भारतातील जनताच मतपेटीतून उत्तर देईल असा टोला ही त्यांनी भाजपाला लगावला. माजी मंत्री खलप मंगळवारी सावंतवाडीत एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी वसंत केसरकर उपस्थित होते.

गोवा सरकारकडून तेथील गाड्या सिंधुदुर्ग व कारवार येथे बाहेर नेल्यास दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खलप यांना विचारले असता ते म्हणाले, सद्यस्थितीत गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना ते असह्य होत आहे. अनेकांनी विदेशात जाणे पसंत केले आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या आता अन्य ठिकाणी वळविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोकणकडे ही पर्यटकांची संख्या वळविल्यास गोव्यावरचा ताण कमी होईल आणि अन्य भागाचा विकास होण्यास मदत होईल असे खलप म्हणाले. 

राजकारणात सद्यस्थितीत फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता हा प्रकार काय नवीन नाही, पण दोन तृतीयांश सदस्य गेल्यांनतर पक्षच दुसर्‍या पक्षात विलीन होतो, असा काही जो नवा पायंडा पडत आहे तो योग्य नाही. आणि हे असेच सुरू राहिल्यास लोकशाहीला घातक ठरू शकते.

यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. येणार्‍या निवडणूकीत फायदा होणार की नाही, हे मी सांगू शकत नाही.पण कॉंग्रेसला चांगली उभारी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून प्रादेशिक पक्ष संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला भारतातील जनते कडून योग्य उत्तर मिळेल असे सांगत फोडाफोडीचे राजकारण संपले पाहिजे अन्यथा प्रत्येक राजकीय पक्षांचे नुकसान होईल असेही खलप म्हणाले. 

  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस