शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

अतिउत्साही पर्यटकांना लगाम

By admin | Published: May 24, 2016 11:48 PM

दोन किल्ल्यांचाही समावेश : ६१ किमी सागर किनारा करणार स्वच्छ

सिंधुदुर्गनगरी : सागरी किनारा स्वच्छता मोहिमेंतर्गत २६ मे रोजी जिल्ह्यातील ३४ सागर किनारे व सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांकडून स्वच्छता राखली जावी तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तनात व पोषाखात योग्य ते तारतम्य पाळले जावे यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.सागरी किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वच्छता व पाणी मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत २६ मे रोजी वेंगुर्ले, मालवण व देवगड तालुक्यातील ३४ सागर किनारे व सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ६१ किलोमीटर अंतराच्या या किनारपट्टीसाठी ३६ ठिकाणी नोडल आॅफिसरांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महसूल कर्मचारी, पंचायत समिती, नगरपंचायत कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ, मंडळे यांचा सहभाग होणार आहे. या अंतर्गत सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक कचरा व काचेच्या बाटल्या याचे विलगीकरण करण्यात येणार आहे. गोळा केलेला कचरा वेंगुर्ला नगरपालिकेच्या स्वच्छता प्रक्रिया यंत्राद्वारे निर्गत केला जाणार आहे. यासाठी यूएनडीपीमार्फत स्वच्छता दुतांसाठी टी-शर्ट, टोपी, हॅण्डग्लोव्हज्चा पुरवठा करण्यात आला आहे. ही स्वच्छता मोहिम सकाळी ७ ते ९ या वेळेत राबविली जाणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.पावसाळी पर्यटनात अति उत्साही पर्यटकांना बंधने घालण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोषाख कसा असावा तसेच वर्तन शिस्तीचे असावे ज्यामुळे पर्यटनस्थळी कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना धास्ती वाटणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. पर्यटनस्थळी स्वच्छता ठेवावी यासाठी कडक निर्बंध घातले जाणार आहेत. पावसाळी पर्यटन व त्यानंतरही जिल्ह्यात येणारे पर्यटक बिनधोक सर्वत्र जावू शकतील यासाठी पोलिसांची मदतही घेतली जाणार असल्याचे अनिल भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोहिम सुरू ठेवणार : सिंहसिंधुदुर्गातील विविध पर्यटनस्थळांवरील साफसफाई व स्वच्छता कायम रहावी यासाठी भविष्यात अशी स्वच्छता मोहिम दोन ते तीन महिन्यांनी घेतली जाणार आहे. त्यावेळी शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला जाईल असे शेखर सिंह यांनी सांगितले.