शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोनवडे मार्ग ‘कोल्हापूर’कडे वर्ग करण्याचा घाट

By admin | Updated: May 20, 2016 23:37 IST

मंत्र्यांच्या पत्रानंतर कार्यवाही सुरू : सिंधुदुर्ग विभागाला पत्रव्यवहार प्राप्त

मिलिंद पारकर -- कणकवली--सोनवडे घाटमार्गाचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील भाग काढून कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्याचा घाट घालण्यात आला आहे. खुद्द बांधकाम मंत्र्यांकडून आलेल्या पत्रानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून तसे पत्र सिंधुदुर्ग विभागाला प्राप्त झाले आहे. गेल्या २० वर्षांपासून सिंधुदुर्ग विभागाकडून हा घाटमार्ग होण्यासाठी प्रयत्न झाले. आता हे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना कोल्हापूर बांधकाम विभागाकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ तालुक्यातील सोनवडे ते कोल्हापूर हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्याला जोडण्यासाठी पर्यायी मार्ग ठरणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचण्यासाठीचे अंतर काही किलोमीटरने कमी होणार आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सहा किलोमीटरचा मार्ग हा वन विभागाच्या अखत्यारित येतो. सुरुवातीला पर्यायी जमिनीचा प्रश्न आणि नंतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून सोनवडे-कोल्हापूर मार्ग वन विभागाच्या अडथळ्यामुळे बराच कालावधी मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकला होता. वन जमिनीसाठी पर्यायी जमीन आणि त्या जमिनीवर लागवड करण्यासाठीचा निधी यापूर्वी वन विभागाला देण्यात आला आहे. राधानगरी अभयारण्यापासून दहा किलोमीटर अंतराच्या आत या मार्गाचा आराखडा येत असल्याने वन विभागाच्यापरवानगीबाबतचे प्रश्न निर्माण झाले. या मार्गाचा कोल्हापूर विभागाकडे ३.८० किलोमीटर, तर सिंधुदुर्ग विभागाकडे ५.७५ किलोमीटर भाग येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १९९८ सालापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्याच्या वन विभागाकडून मार्गासाठी मंजुरी मिळाली. वन्य प्राण्यांना जाण्यासाठी काही ठिकाणी ओव्हरब्रीज आणि काही ठिकाणी अंडरपास ठेवण्याचा पर्याय त्यासाठी सुचविण्यात आला आहे. रस्ता कसा जाणार याच्या आखणीला बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता मुंबई यांच्या कार्यालयाकडून यापूर्वीच मंजुरीही मिळाली होती. राज्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र शासनाची मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, याचवेळी सिंधुदुर्गातील मार्ग कोल्हापूरकडे देण्याचा घाट घालण्यात आला आहे. सोनवडे घाटमार्गावर वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जे ओव्हरब्रीज आणि अंडरपास ठेवण्यात येणार आहेत, ते नेमके कोणत्या ठिकाणी असावेत, यासाठी ‘डब्ल्यू.आय.आय.एफ.’ या संस्थेचे प्रतिनिधी घाटमार्गाचा सर्व्हे करणार आहेत. त्यानंतर या जागा निश्चित होतील. (प्रतिनिधी)नव्याने आखणीसाठी तीन कोटीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर विभागाकडून सोनवडे घाटमार्गाची नव्याने आखणी व भूसंपादन करण्यासाठी तीन कोटींचे काम मंजूर करून घेण्यात आले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग विभागाने केलेली मार्गाची आखणी चुकीची ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तक्रार कोणाकडे करायची? घाटमार्ग कोल्हापूर विभागाकडे हस्तांतरित झाला तर रस्ता बांधकाम होताना जर कोणती समस्या उद्भवली, उदाहरणार्थ माती जाऊन अथवा पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले, तर तक्रार करण्यासाठी कोल्हापूर गाठायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.