शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 18:13 IST

shiv bhojnalaya Sindhudrg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते १३ महिन्यांत १ लाख, ८४ हजार ५६६ गरजूंनी घेतला लाभ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.गरीब, गरजू व कष्टकऱ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली. २६ जानेवारी २०२० मध्ये एकाच दिवशी राज्यभरात या थाळीचा शुभारंभ करण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील डीआरडीए येथे केंद्र स्थापन करून शुभारंभ केला. सुरुवातीला थाळीची किंमत १० रुपये होती. दोन चपात्या, भाजी, आमटी व भात असा आहार दिला जात होता. मात्र, कोरोनाच्या काळात या थाळीची किंमत कमी करण्यात आली.मार्च २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले. या काळात मजूर, स्थलांतरित, बेघर, बाहेर गावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी थाळीची किंमत कमी करण्यात आली होती.या थाळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या १२ केंद्रे सुरू आहेत. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली तालुक्यात थाळीची प्रतिदिन मर्यादा १०० आहे तर इतर पाच तालुक्यांत हीच मर्यादा ७५ थाळींची आहे. दर पंधरा दिवसांनी शिवभोजन केंद्र चालकांचे बिल अदा केले जाते. या योजनेसाठी पुरेसा निधी सरकारकडून प्राप्त होत आहे.शिवभोजन थाळी योजना यशस्वीशिवभोजन थाळीला गरीब व गरजू नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी रोजी सुरू झालेली शिवभोजन थाळी ही योजना आज खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसून येत आहे. गेल्या १३ महिन्यांत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत या थाळीचा १ लाख ८४ हजार ५६६ जणांनी लाभ घेतला आहे.प्रतिष्ठित व्यक्तीही घेतात या योजनेचा लाभया योजनांचा लाभ गरीब व गरजू नागरिकांनी घ्यावा असे सरकारने म्हटले आहे. परंतु बऱ्याच वेळा काही कर्मचारी, धनधांडगे नागरिक या योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अन्यथा खरे लाभार्थी बाजूलाच राहतील व लाभ दुसरेच घेतील असे व्हायला नको.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयsindhudurgसिंधुदुर्ग