शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:19 IST

gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आह. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे २२६ प्रभागात अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती १०८७ उमेदवार आपले भवितव्य अजमावणार

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आह. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे २२६ प्रभागात अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या असून जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून रंगू लागली आहे. ७० ग्रामपंचायतींच्या ६०० सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या जागांसाठी १५५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

यातील १५ अर्ज छाननीच्या वेळी अवैध ठरले होते तर १५३५ अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ जानेवारीला तब्बल ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ६०० जागांपैकी १०६ जागा बिनविरोध झाल्या ४९४ जागांसाठी आता प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. यात १०८७ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत.त्यात देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १८९ जागांसाठी ४०४ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ५५ अर्ज मागे घेण्यात आले असून ३०७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या ११९ जागांसाठी ३८२ अर्ज पात्र होते. त्यापैकी ११७ अर्ज मागे घेण्यात आले असून २६५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या १०३ जागांसाठी २३४ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ५५ अर्ज मागे घेतले असून १४२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या ५४ जागांसाठी १३७ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २८ अर्ज मागे घेण्यात आले असून १०५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ७१ जागांसाठी २०८ अर्ज पात्र ठरले होते. ४० अर्ज मागे घेण्यात आले असून १०५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या २१ जागांसाठी ४९ अर्ज पात्र ठरले होते. १७ अर्ज मागे घेण्यात आले असून २१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या १८ जागांसाठी ५५ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ६ अर्ज मागे घेतले असून ४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या २५ जागांसाठी ६६ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २४ अर्ज मागे घेण्यात आले असून ३४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०० जागांसाठी १५३५ अर्ज पात्र ठरले. ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १०८७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.६०० सदस्य जागांपैकी १०६ जागा बिनविरोध झाल्या असल्याने आता ४९४ जागांसाठी १०८७ उमेदवारांचे भवितव्य १५ जानेवारी रोजी सिलबंद होणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी या निवडणुकीत दुरंगी व तिरंगी लढत निश्चित झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी जरी लढत असली तरी खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजप अशीच दुरंगी लढत होणार असल्याचे दिसते.१०६ जागाबिनविरोधजिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०० जागांसाठी निवडणूक होत असून यातील १०६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक देवगड आणि वैभववाडी तालुक्यात बिनविरोध झाल्या आहेत. त्यात देवगड ४२, वैभववाडी ३७, मालवण ४, कुडाळ ४, कणकवली ११ तर दोडामार्ग तालुक्यातील ८ जागांचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग