शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

स्मार्ट ग्रामसाठी मांगवलीची निवड, ग्रामपंचायतीला पत्र प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:56 IST

वैभववाडी तालुक्यातील मांगवली ग्रामपंचायतीची शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झाली आहे. स्मार्ट ग्राम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवडीचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी १० लाख रुपये विशेष निधी मिळणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट ग्रामसाठी मांगवलीची निवड, ग्रामपंचायतीला पत्र प्राप्तविकास कामांसाठी मिळणार १० लाखांचा विशेष निधी

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील मांगवली ग्रामपंचायतीची शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झाली आहे. स्मार्ट ग्राम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवडीचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी १० लाख रुपये विशेष निधी मिळणार आहे.राज्यात आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविली जात होती. ती योजना राज्य शासनाने २०१६ मध्ये बंद करुन त्या योजनेचे स्वरुप व अंमलबजावणीत बदल करीत स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे ग्रामपंचायतींना स्वयंमुल्यांकनाद्वारे योजनेत सहभागी होऊन ठोस निधी मिळविण्याची संधी उपलब्ध करुन दिली असून तालुक्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतीला १० लाख तर जिल्ह्यात निवड झालेल्या ग्रामपंचायतीला तब्बल ४० लाख रुपये निधी दिला जातो.स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या बाबींशी संलग्न मुद्द्यांसाठी १०० गुण स्मार्ट ग्राम योजनेत निर्धारित करण्यात आले आहेत. त्यानुसार मांगवली ग्रामपंचायतीने स्वयंमुल्यांकनाद्वारे ६५ गुणांच्या पुर्तता करुन योजनेत सहभाग घेतला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीमार्फत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यात आली होती.गतवर्षी मांगवली ग्रामपंचायतीने आयएसओ दर्जा मिळविल्यानंतर प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता ग्रामपंचायतीची तालुक्यातून स्मार्ट ग्रामसाठी निवड झाली आहे. यामध्ये सरपंच राजेंद्र राणे, उपसरपंच संतोष ईस्वलकर, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक उमेश राठोड व कर्मचा-यांचे विशेष योगदान आहे.स्मार्ट ग्रामचा निधी नाविन्यपूर्ण योजनांवर होणार खर्च!स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झाल्यामुळे मांगवली ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी १० लाख रुपये निधी मिळणार आहे. या निधीतून ग्रामपंचायतींनी शासनाने निर्धारित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन व त्यापासून खत निर्मिती, जलशुध्दीकरण प्रकल्प (आरओ प्लांट), सौर पथदिवे, बायोगॅस सयंत्र निर्मिती(बायोमास गॅसिफायर) आदी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासंबंधी शासनाचे निर्देश आहेत.मांगवली ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्रामसाठी निवड झाली असून गावातील विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीsindhudurgसिंधुदुर्ग