शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

महागाईमुळे सिंधुदुर्गातील जनता हवालदिल:राजू मसुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 7:46 PM

काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून नेहमीच सर्वसामान्यांचा विचारसिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल

सावंतवाडी : काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाची स्थापना १२५ वर्षांपूर्वी अनेक स्वातंत्र्यवीर तसेच महात्मा गांधींच्या त्यागातून झाली आहे. तसेच पक्षाने लोकहिताची अनेक विकासकामे केली असून राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत १०८ रुग्णवाहिका अशा महत्त्वपूर्ण योजना काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आल्या आहेत.

राजीव गांधी निराधार योेजनेपासून ते महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा त्याचप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंत गणवेश व मोफत पुस्तके, पोषण आहार देण्याचे काम, शेतकºयांना शेतकरी जनता अपघात विमा योजना काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे.

समाजातील सर्व जातीच्या व्यक्तींना तसेच महिलांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीत ५० टक्के आरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण धोरण राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू झाले. त्यामुळे समाजात आज महिला मानाने फिरत आहेत.

याउलट युती सरकारच्या काळात अच्छे दिन आणणाºया सरकारकडून भरमसाट महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदीमुळे बाजारपेठेवर झालेला आर्थिक परिणाम यामुळे जनता कंटाळली आहे. जीएसटीचा दर १८ टक्केपर्यंत काँग्रेस राजवटीच्या काळात ठरलेला होता. तो आता २८ ते ३५ टक्केपर्यंत झाला आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता या निवडणुकीत नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही राजू मसुरकर यांनी म्हटले आहे.