शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

आदित्य ठाकरेंनी कोकणसाठी किती निधी दिला?, नितेश राणेंचा सवाल 

By सुधीर राणे | Updated: September 26, 2023 11:48 IST

कणकवली: सिंधुदुर्ग , रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत ...

कणकवली: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सत्ता असताना कोकणसाठी किती निधी दिला ते प्रथम सांगावे? असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर केले होते की कोकणामध्ये जे नियमित कर्ज भरतात त्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल. पण त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीमध्ये ते पन्नास हजार सोडाच पण एक दमडी पण भेटलेली नाही. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिव मंदिराला ५० लाख रुपये स्वतः पदरमोड करून देणार असेही उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. मग आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनी जाहीर केलेल्या पैकी एक तरी काम पूर्ण केले आहे काय? याबाबत जनतेला सांगावे.शिंदे आणि फडणवीस सरकारने ठाकरेंनी जाहीर केलेले ५० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा व पर्यटकांसारखे इथे येण्यापेक्षा त्यांचे वडिल अडीच वर्षांमध्ये सरकारमध्ये असताना तसेच ते स्वतः पर्यटन मंत्री असताना किती वेळा कोकणात आले ते सांगावे. गोव्यामध्ये येऊन फाईव्ह स्टारमध्ये नाईट लाईफ करणे सोपे आहे. पण सिंधुदुर्गसह कोकणात येऊन पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे फार कठीण आहे. या कोकणात वादळ आले तेव्हा एक दमडी पण ठाकरे सरकारने दिली नाही. निसर्ग वादळाच्या वेळी ७५ लाख सिंधुदुर्गाला मिळणार होते. त्याचे काय झाले? एक रुपया देखील मिळालेला  नाही. त्यामुळे  पुढच्या वेळी आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात आले तर त्यांनी  खुल्या व्यासपीठावर यावे. मी पण त्यावेळी येईन. आपण कोकणाच्या विकासावर चर्चा कर. कोकणच्या जनतेला सत्य काय आहे ते समजूदेत असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरे