शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
3
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
4
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
5
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
6
"जाता जाता महायुती सरकारकडून महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर’’, काँग्रेसची टीका   
7
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
8
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
9
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
10
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
11
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
12
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
13
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
14
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
15
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
16
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
17
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
18
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
19
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
20
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

कुडाळात चक्रीवादळ

By admin | Published: July 10, 2016 11:58 PM

पावसाचा जोर : झाडांची पडझड; घरांचेही नुकसान; खारेपाटणमध्ये पूरसदृश स्थिती

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यात झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे, तर कुडाळ येथील महामार्गावर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती, तर वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. पावसामुळे खारेपाटण शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाबरोबरच चक्रीवादळाचा फटका कुडाळ तालुक्यातील बऱ्याच गावांना सहन करावा लागला. नांदगाव मधलीवाडी येथील दत्तमंदिर स्टॉपलगत रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एक म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला आलेल्या भरती व पुराच्या पाण्यामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलापासून जवळच हिवाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाची फांदी तुटून पडली, त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. (वार्ताहर) सिंधुदुर्गात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दोडामार्गमध्ये ६० मि.मी., सावंतवाडी ९५ मि.मी., कुडाळ ७५ मि.मी., वेंगुर्ले ८६.४० मि.मी., मालवण ५४ मि.मी., देवगड ३१ मि.मी., वैभववाडी ७९ मि.मी., तर कणकवली तालुक्यात ६८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. कणकवली तालुक्यात रविवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ४८ मि.मी. पाऊस झाला होता. वेंगुर्ले, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, पावसामुळे खूप मोठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत आपत्कालीन कक्षात झालेली नव्हती. मालवण बंदरात धोक्याचा तीन नंबरचा बावटा ४मालवणात दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जोर पकडला आहे. समुद्रही चांगलाच खवळलेला आहे. शनिवारी बंदर विभागाने पुन्हा एकदा धोक्याचा तीन नंबर बावटा बंदरात लावला आहे. ४गेल्या १५ दिवसांत बंदरात धोक्याचा तीन नंबर बावटा तीन वेळा लावण्यात आला. मच्छिमारांनी मासेमारीस जाऊ नये, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे बंदर विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.