शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Nitesh Rane: 'त्या' विधानावर नितेश राणे ठाम, विरोधकांना टोला लगावत स्पष्टीकरण देताना म्हणाले..

By सुधीर राणे | Updated: December 14, 2022 16:46 IST

मतदार संघातील जनतेशी माझे अतुट नाते. त्‍यामुळे मला अधिकारवाणीने बोलायचा हक्‍क.

कणकवली: नांदगाव येथील प्रचारसभेत मी योग्‍य तेच बोललो आहे. केंद्रात, राज्‍यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? गावात निधी कसा येणार ? याचे उत्तर आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी द्यावे. तसेच त्याची चर्चा माझ्याबरोबर त्यांनी जाहीर व्यासपीठावर करावी. असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी आज दिले. राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार असताना  कणकवली नगरपंचायतीला निधी दिला नाही. जिल्हा नियोजन समितीत मी सुचविलेली कामे डावलली त्‍यावेळी नाईक, उपरकर गप्प का राहिले? असाही सवाल त्‍यांनी केला. कणकवली येथे आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत उपस्थित होते.  यावेळी बोलताना राणे म्‍हणाले, कणकवली मतदार संघातील जनतेशी माझे अतुट नाते आहे. त्‍यामुळे मला अधिकारवाणीने बोलायचा हक्‍क आहे. मतदारसंघातील लोकही काही चुकीचे घडल्यास माझ्याशी  बोलत असतात. आज गल्लीपासून ते दिल्‍लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. त्‍यामुळे भाजप पुरस्कृत सरपंच आणि उमेदवारांना जर मतदान केले नाही. तर संबधित गावाचा विकास कसा होणार? याचे विश्लेषण माझ्या विरोधात बोलत असणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी करावे. ग्रामपंचायतीत ज्‍याचे पॅनल, उमेदवार निवडून येतील त्‍यांनी गावाचे प्रश्‍न रस्ते, पाणी, वीज प्रश्न सोडवावा. राज्‍य सरकार, केंद्र सरकारकडून निधी आणावा. अशी भावना मतदारांची असते, म्‍हणून ते पॅनेल निवडून देतात. त्‍यांनी जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून दिला. तर निधी कसा येणार? माझ्या आणि मतदारसंघाच्या नात्‍यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्यामुळे कुणाला प्रसिद्धी मिळत असेल किंवा कुणाला आपल्‍या मालकांकडून वाहवा मिळत असेल तर त्यात मी समाधानी आहे. खासदार विनायक राऊत हे केंद्र शासनाच्या विरोधी गटात आहेत. कुठलीही केंद्राची योजना अथवा निधी ते आणू शकत नाहीत. आमदार वैभव नाईक हे राज्यात  विरोधी पक्षात आहेत. गेल्‍या साडे पाच महिन्यात आमदार नाईक हे आपल्‍या मतदारसंघामध्ये एक रूपयाचा तरी निधी आणू शकले आहेत का? याचे उत्तर त्‍यांनी द्यावे. ग्रामपंचायतींना ज्या मंत्रालयामार्फत निधी येतो. त्या खात्‍याचे मंत्री भाजपचे आहेत. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निधी आणूच शकत नाहीत.

भाजपचा मी एकमेव आमदार

पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत भाजप पक्षाचा मी एकमेव आमदार आहे. त्‍यामुळे माझ्या पक्षाचे नेते माझ्या मतदारसंघावर अन्याय करणार का? मी दिलेली कामांची यादी नाकारणार का?  ते राणेंच्या मुलाच्या मतदारसंघाला कधीही डावलणार नाहीत असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

कणकवलीवर महाविकास आघाडीने अन्याय केलाअडीच वर्षाच्या कालावधीत कणकवली मतदारसंघावर महाविकास आघाडीने प्रचंड अन्याय केला. साकवांची एकही यादी स्वीकारली नाही. रस्ते यादी पाठवली त्‍याला मंजूरी दिली नाही. मी जिल्‍हा नियोजनमध्ये नेहमी भांडायचो. पण मी पाठवलेल्‍या कामांच्या याद्या बदलून टाकायचे. त्‍यावेळी परशुराम उपरकर, वैभव नाईक यांना चुकीचे का वाटले नाही.

बिनविरोध झालेल्‍या गावांना ५० लाखांचा निधी

जे माझ्याकडे ग्रामपंचायती देतील त्या ग्रामपंचायतींच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. बिनविरोध झालेल्‍या गावांना मी ५० लाख रूपयांचा निधी देणार आहे. ज्‍यांच्याकडे विकास करण्याची धमक आहे, त्‍यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी उभे राहावे असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNitesh Raneनीतेश राणे Vaibhav Naikवैभव नाईक Parshuram Upkarपरशुराम उपरकर