शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 01, 2024 7:26 PM

सिंधुदुर्ग : उष्णतेची तीव्र लाट सध्या सुरू आहे. अशावेळी कामानिमित्त काही लोकांना घराबाहेर पडावे लागते. ते उन्हातून जेव्हा घरी ...

सिंधुदुर्ग : उष्णतेची तीव्र लाट सध्या सुरू आहे. अशावेळी कामानिमित्त काही लोकांना घराबाहेर पडावे लागते. ते उन्हातून जेव्हा घरी येतात तेव्हा सर्वात प्रथम फ्रीजमधील थंड पाणी पितात; परंतु असे केल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.उन्हाळ्यात थंड पाणी पिल्याने काही लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात लिक्विड ड्रिंक्सचे सेवन केले जाते. यामध्ये पाण्यासोबतच लस्सी, ज्यूस, नारळपाणी, लिंबू सरबत अशी विविध प्रकारची पेये येतात. उन्हाळ्यात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे; परंतु पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजमधील पाणी पितात. तहान शमविण्यासाठी किंवा थकवा दूर करण्यासाठी थंड पाणी पिले जाते; परंतु त्यामुळे उष्णतेपासून काही काळ आराम मिळत असला, तरी त्यामुळे खूप नुकसानही होते.

उन्हाळा लागल्याची लक्षणे काय?उन्हाळा लागल्यास शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्लस्वरूप घेते. यालाच आपण उन्हाळा लागणे असे म्हणतो. उन्हाळा लागल्यास मूत्रमार्गाची जळजळ होते; तसेच थकवा येतो. अंतर्गत दाह निर्माण होतो.

उन्हातून आल्यावर घ्या काळजीउन्हातून घरी आल्यावर लगेच एसी किवा कूलरमध्ये बसू नये. शरीराला वेगवेगळ्या तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे एसी असल्यास त्याचे तापमान कमी ठेवा.

उन्हात बाहेर पडताना अशी घ्या काळजीउन्हात जाण्याअगोदर उपाशीपोटी बाहेर पडू नये. त्यामुळे घरून निघताना नाश्ता किंवा जेवण करूनच बाहेर पडले पाहिजे. आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ३ ते ४ लिटरपर्यंत पाणी लागते. उन्हाळी लागण्याचा त्रास मुख्यत्वे पाणी कमी पिल्याने होतो. त्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. - डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानHealthआरोग्य