शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

सिंधुदुर्गात पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, वीजरोधक यंत्रणा कागदपत्रावरच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 24, 2024 7:09 PM

प्रशासनाने जागृत होणे गरजेचे

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दरवर्षी वीज पडण्याच्या घटना घडत असतात. मागील आठवड्यात वीज कोसळून काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. अनेकवेळा पाळीव जनावरांनाही वीजेचा फटका बसतो.मुसळधार पाऊस पडत असला की त्यासोबत विजांचा कडकडाट सुरू होतो, अशा वेळी वीज पडण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी वीजरोधकयंत्र हे उपयोगी पडते. मात्र, सिंधुदुर्गात ही यंत्रणा काही वर्षांपासून शासकीय कागदपत्रावर आहे. संपूर्ण जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे.वीजरोधक यंत्र म्हणजे काय?

  • पावसाळा, वादळ या काळात मोठ्या प्रमाणात विजा कडाडतात. अनेकदा वीज ही कुठे ना कुठे पडत असते. यामुळे जीवितहानी होत असते. विजांमुळे वित्तहानी होण्याचे प्रमाणही अधिक असते.
  • या पार्श्वभूमीवर वीज पडणार असेल तर ती आधीच रोखण्यासाठी वीजरोधक हे यंत्र उपयोगी पडते. त्यामुळे वीज जमिनीवर न पडता या यंत्राद्वारे रोखली जाऊन जीवितहानी टाळली जात असते.

असा होतो परिणामवीजरोधक यंत्रणा कार्यान्वित असेल तर वीज पडण्यापासून संरक्षण होते. वीज पडणार असेल तर आधीच या यंत्रणेने खेचली जाते. तसेच या यंत्रणेमुळे दोन किलोमीटर परिसरात वीज पडत नाही.पाच वर्षांत जिल्ह्यात वीज पडून काही जणांचा मृत्यूसिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात पाचपेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. दरवर्षी वीज पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटनेत जीवितहानी टळते.यंत्रणा कार्यान्वित का होत नाही?राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. जिल्ह्यासाठी आपत्ती रोखण्यासाठी कोट्यावधी निधीची गरज आहे. या निधीच्या माध्यमातून आपत्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग