शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

पूल तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी

By admin | Published: August 28, 2016 12:26 AM

वायकर : गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे मुजवणार

रत्नागिरी : सहा वर्षांपूर्वी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांत जुन्या पुलांकडे लक्षच दिले गेलेले नाही. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०१० मध्ये सर्वच पुलांचे आॅडिट करण्यात आले होते. सहा वर्षांत आॅडिट झालेले नाही. तरीही जुन्या पुलांकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. महामार्गावरील पुलांच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात ६७० साकव मोडकळीस आले आहेत. यामध्ये ज्या साकवांची स्थिती अगदीच वाईट असेल ते पाडून त्यांच्या जागी नवीन साकवांचे बांधकाम करण्यात येईल. रत्नागिरी विमानतळावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स उतरवता यावी, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यासाठी कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स लॅबचे युनिट आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून खर्च करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. याकडे पालकमंत्र्यांचे लक्षवेधले असता ते म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याची सूचना बांधकाम विभागाला केली आहे. दि. १ सप्टेंबरपासून हे खड्डे भरण्याचे काम वेगात करण्यात येणार असून, गणेशोत्सवापूर्वी ते पूर्ण होईल. हे खड्डे खडी व डांबराने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणवेशाचे पैसे वर्गखोल्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी डीपीडीसीमधून दिलेले तीन कोटी रुपये पडून आहेत. तसेच ग्रामीण भागातील शाळांच्या १५१ वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून, त्या कधीही जमीनदोस्त होऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणवेशाचे अनुदान वर्गखोल्यांसाठी वापरण्यासाठी वर्ग करण्यात येईल, असे वायकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वय हरविल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. याबाबत संबंधितांना बोलावून सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.