शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

जलजीवन मिशनची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करा, अन्यथा..; उद्धवसेनेचे सतीश सावंतांनी दिला इशारा

By सुधीर राणे | Updated: July 15, 2024 17:41 IST

कणकवली: सिंधुदुर्गात जलजीवन मिशनची कामे करणारे ठेकेदार हे विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मात्र, आमदार नितेश राणे यांनी उद्धवसेनेचे कार्यकर्ते ...

कणकवली: सिंधुदुर्गात जलजीवन मिशनची कामे करणारे ठेकेदार हे विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मात्र, आमदार नितेश राणे यांनी उद्धवसेनेचे कार्यकर्ते असलेले ठेकेदार रामदास विखाळे यांच्याच कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेबाबत आस्था असेल तर पक्ष न पाहता अपूर्ण कामे ठेवणाऱ्या सर्व ठेकेदारांची चौकशी करून त्यांनी येत्या दहा दिवसात कामांचा आढावा घेऊन दाखवावा. अन्यथा उद्धवसेनेच्या माध्यमातून सर्व ठेकेदारांची यादी जाहीर केली जाईल. असा इशारा उद्धवसेनेचे कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.कणकवली विजय भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,धीरज मेस्त्री,सिध्देश राणे उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, कणकवली तालुक्यामध्ये वरवडे, कलमठ, गांधीनगर अशा विविध गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. यामध्ये गांधीनगर, कलमठ या गावातील जलजीवनची कामे पूर्ण झालेली नाहीत. परंतु या अर्धवट असलेल्या कामांची चौकशी न करता रामदास विखाळे यांनी  ९० टक्के कामे पूर्ण केली असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी करणे म्हणजे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. कोणतीही विकास कामे ही जनतेच्या कराच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे भाजपचा किंवा उद्धवसेनेचा ठेकेदार म्हणून त्याच्याकडे न पाहता सरसकट सर्वांच्याच कामाची चौकशी करा.कासार्डे, लोरे परिसरामध्ये सिलिका मायनिंगचा अनधिकृत व्यवसाय गेली काही वर्षे सुरू आहे. आकसापोटी आम्ही कोणाबाबत अद्यापपर्यंत तक्रारी केलेल्या नाहीत. मात्र, नितेश राणे यांनी संजय आग्रे यांच्याबाबत तक्रार करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला लावली. मात्र, या व्यवसायामध्ये सर्वाधिक भाजपचेच कार्यकर्तेच आहेत. त्यांच्यावरही कारवाई व्हावी.अशी मागणी आम्ही करणार आहोत.खऱ्या अर्थाने नितेश राणे यांनी जनतेच्या हिताची कामे करणे गरजेचे होते. करूळ घाट गेले काही महिने बंद आहे. या कामासाठी जो ठेकेदार नेमण्यात आला होता, त्याला तो ठेका मिळू नये म्हणून नितेश राणे यांनी  दबाव आणला होता. आता हा घाट गेले सात, आठ महिने बंद असतानाही राणे गप्प का आहेत? याबाबतही वैभववाडीच्या जनतेने विचार करावा. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. आयुष्यमान भारत या योजनेचा फायदा सर्वसामान्यांना होत नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. मात्र, याकडे नितेश राणे यांचे दुर्लक्ष आहे. असेही यावेळी सावंत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेSatish Sawantसतीश सावंत