शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
3
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
4
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
5
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
6
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
7
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
8
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
9
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
10
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
11
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
12
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
13
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
14
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
15
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
16
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
17
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
18
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
19
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
20
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले..

By अनंत खं.जाधव | Published: August 28, 2024 4:54 PM

सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार 

सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला नौदल जबाबदार नसून सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. कल्याण मधील जयदीप आपटे यांच्यापर्यंत नौदलाला कोणी नेऊन पोचवलं यांची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यापूर्वीच गुन्हे कसे दाखल झाले, यात काही तरी गौडबंगाल आहे असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच चौकशी समिती नेमायची असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन नाव ठरवा अशी मागणी ही पाटील यांनी केली आहे.मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यांची पाहणी करण्यासाठी पाटील बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना तर इव्हेंट झाली असून खात्यात पैसे पोचण्यापूवीच पैसे मिळाले का विचारत सुटले आहेत. सर्वच बाजूंनी सरकारची नाचक्की झाली आहे. त्याना सर्वसामान्य जनतेचे सोयरसुतक राहिले नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत.जबाबदारी झटकून चालणार नाही मालवण राजकोट किल्ला परिसरात छत्रपतींचा जो पुतळा उभारला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला आहे. मात्र आता नौदलाने हा पुतळा उभारला असे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार अंग झटकण्याचा आहे. जयदीप आपटे यांच्यापर्यंत कोणी नेऊन सोडले, त्यांना मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव होता का या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जबाबदारी झटकून चालणार नाही अशी मागणी ही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समितीत नेमाया घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे का,? असे विचारताच पाटील यांनी आजकाल निवृत्त न्यायाधीश हे चौकशी करायला दोन वर्षे लावतात त्यामुळे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समिती नेमावी असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाच तेथील फरशी निघाल्या होत्या. त्यावरूनच यात भ्रष्टाचार किती झाला हे जनतेने जाणून घ्यावे. हे सरकार इव्हेंटजीवी झाले आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.मंत्री केसरकरांच्या आश्वासनाचे काय झाले?मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात फक्त लोकांना आश्वासनेच दिली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रेल्वे टर्मिनसचे काय झाले ते त्यांनी सांगावे. आता जनताच त्यांना त्याची जागा दाखवून देईल. 

सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार सावंतवाडी मतदारसंघावर जरी उद्धव सेनेकडून दावा केला जात असला तरी आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीत सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार असून आमचे उमेदवार ठरले आहेत पण आताच घोषणा करणार नाही असे म्हणत अर्चना घारे-परब याच्याकडे अंगुली निर्देश केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकार