शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

By वैभव देसाई | Updated: May 28, 2019 07:00 IST

23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला.

- वैभव देसाई23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपानं 200 किंवा 250 नव्हे, तर तब्बल 303 जागा जिंकल्या. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालही धक्कादायक म्हणावा लागेल. कारण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल कोकणी जनतेत फारसा जनाधार असल्याचं निवडणुकीदरम्यान दिसलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनातही कुठे तरी पराभवाची पाल चुकचुकत होती. या लढतीत मोदी प्रभावामुळे भाजपाची मते धनुष्यबाणाला मिळाली आणि विनायक राऊत यांचा विजय सुकर झाला. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,58,022 एवढी मतं मिळाली असून, निलेश राणेंच्या पारड्यात 2,79,700 मते पडली. विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर यंदा 1 लाख 78 हजार 322 मतांनी विजय मिळवला. निलेश राणे यांच्या पराभवामुळे ईव्हीएमबद्दलही संशयाचं भूत निर्माण झालंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकालात EVM मशिनमध्ये trending set केल्याचा आरोपही स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत आणि राणे या दोन्ही उमेदवारांना ठराविक अंदाजात मते कशी काय मिळू शकतात?, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबद्दल संशयाचं वातावरण समाजाच्या अनेक स्तरांमध्ये असल्याचा उल्लेखही केला. त्यामुळे साहजिकच या विजयाबद्दल एकूणच कोकणी जनता साशंक आहे. असो. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालामुळे कोकणातली राजकीय समीकरणं आता बदलणार आहेत. आताच्या निवडणुकीत सेना-भाजपा युती विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणजेच नारायण राणे अशी लढत दिसली. पण या लढतीत एका अर्थी राणेंचा कोकणी जनतेनं पराभव केल्याचंही मान्य करावं लागेल. कणकवली या विधानसभा मतदारसंघात वैभववाडी आणि देवगड या तालुक्यांचा समावेश आहे. कणकवली हा पूर्वीपासून राणेंचा अभेद्य असा बालेकिल्ला समजला जातो. युतीकडून नेहमीच या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतो, कारण या मतदारसंघात शिवसेनेची म्हणावी तशी ताकद नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघातून यंदा स्वाभिमानला 40 हजारांचं मताधिक्य पडण्याचा अंदाज असताना निलेश राणेंना विनायक राऊतांपेक्षा फक्त 10 हजार 731 एवढंच मताधिक्य मिळालं. तर विनायक राऊत यांना चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघांतून चांगलं मताधिक्य मिळालं. चिपळूणमध्ये राऊतांना 87,630 मते मिळाली तर निलेश राणेंना 30, 397 मतं मिळाली. त्यामुळे राऊतांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राणेंवर 57,233 मतांची आघाडी घेतली. तर रत्नागिरीत राऊतांना 1 लाखांचं मताधिक्य मिळालं, तर दुसरीकडे निलेश राणेंना 41 हजार एवढ्या मतांवरच समाधान मानावं लागलं.
कुडाळमधून निलेश राणेंना जास्त मते मिळाली नसली तरी सेनेच्या राऊतांना फक्त 63 हजार 909 मतांवर समाधान मानावं लागलं. या मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक आमदार असूनही शिवसेनेचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटलं. पण स्वाभिमान पक्षालाही अपेक्षित मते मिळालेली नाहीत. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा हा गड समजला जातो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही गेल्या वेळेपेक्षा यंदा शिवसेनेचं मताधिक्य कमी झालेलं आहे. यंदा शिवसेनेला या मतदारसंघातून 74 हजार 233 एवढी मतं मिळाली. तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना याच मतदारसंघातून 44 हजार 845 इतकी मतं मिळाल्यानं केसरकरांचा सावंतवाडीच्या जनतेवर असलेला प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचंही चित्र समोर आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे