शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

माफियांनी उखडले किनारे

By admin | Published: March 09, 2015 9:32 PM

नागरिकांत संताप : शेकडो टन वाळूचे होतेय उत्खनन...

रत्नागिरी : पर्यटनवृध्दिसाठी जिल्ह्यातील ज्या सागरी किनाऱ्यांकडे पाहिले जात आहे, ते किनारेच वाळूमाफियांकडून उखडले जात आहेत. दिवसाढवळ्या रत्नागिरीतील विविध किनाऱ्यांवरील शेकडो टन पांढरी वाळू (सिलिका) वाळूमाफियांकडून उत्खनन करून चोरली जात आहे. रत्नागिरीतील पांढरा समुद्र, काळबादेवी, आरे-वारे, ढोकमळे याठिकाणची वाळू राजरोसपणे काढली जात असून, महसूल विभाग मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष का करत आहे? सागरी किनाऱ्यावरील वाळूउपसा करण्याचे परवाने देण्यात आले आहेत काय? असे संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नद्यांमधील वाळू उपसा करण्यावर शासनाचे निर्बंध आल्यानंतर वाळूमाफियांनी आता किनाऱ्याकडे मोर्चा वळविला आहे. तालुक्यात किनारपट्टीवर अनेक ठिकाणी शेकडो टन वाळूचे साठे करण्यात आले आहेत. दररोज हे सागरी किनारे वाळू उत्खननाच्या नावाखाली उखडले जात आहेत. त्यामुळे सागरी लाटांमुळे धूप होण्याऐवजी वाळू उत्खननामुळे सागराच्या शेजारील वस्तींना धोका निर्माण होणार आहे. रत्नागिरीजवळील पांढरा समुद्र येथे दररोज शेकडो टन वाळू काढली जात असून, वाहने व बैलगाड्यांद्वारे ही वाळू वाहून नेली जात आहे. त्यामुळे ज्याठिकाणी काही समाजसेवी संस्थांनी स्वच्छतेचा नारा देणारे फलक लावले आहेत, त्या भागातच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मिरकरवाडा बंदरातील गाळ म्हणून काढलेली वाळूही चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे हा ढिगाराही सर्वत्र पोखरलेला असून, त्यातील शेकडो टन वाळूची चोरी झाली आहे. बेकायदा उपसा केलेली किनाऱ्यावरील वाळू वाहनांबरोबरच बैलगाड्यांमधूनही वाहून नेली जात आहे. काळबादेवी येथील किनाऱ्यावर बैलगाड्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. रोज येथे दहा बैलगाड्या वाळू वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या दिवसाला ६० ते ७० फेऱ्या होतात. बैलगाड्यांमधील वाळू ५०० रुपयांना विकली जात आहे. कोकणच्या किनाऱ्यांचा ऱ्हास केला जात आहे. (प्रतिनिधी)गॉडफादर कोण?किनाऱ्यावरील वाळू उपसा सुरू असताना काहीजणांनी त्याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. परंतु तक्रार केल्यानंतर महसूलचे अधिकारी कधीच त्या ठिकाणी तातडीने पोहोचत नाहीत, अशी ग्रामस्थांचीच तक्रार आहे. याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचे गॉडफादर आहेत तरी कोण, असा सवाल केला जात आहे.