शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Maharashtra Election 2019 : आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्र्यांकडून भाजपामध्ये 'स्वागत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:08 IST

'एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील'

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्येभाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या आक्रमकतेविषयी भाष्य केले. 

नितेश राणे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर आक्रमकतेबाबत संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याशिवाय, कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. इतर सगळ्या उमेदवारांना मिळून 30 टक्के मते मिळतील. हे माझे भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच, नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-- नारायण राणेंसोबत भरपूर काम केले आहे.- आक्रमक विरोध पक्षनेता म्हणून मी त्यांना पाहिले आहे.- स्वाभिमान परिवार आमचा झाला. राणेंच्या नेतृत्वाचा फायदा होईल.- नितेश आक्रमक, संयमी नेतृत्व म्हणून पुढे येतील.  - महाराष्ट्र कुठेही चुरस नाही.- जिंकणारे लोक आहोत शांततेने वागा.- मागील निवडणुकीत ४२ होते आता २४ येतील.- राहुल गांधी लोकसभेत भाषण करायचे तेच करत आहेत.-जनादेश मोदींसोबत आहे.- पाच वर्षांत ३० हजार किलोमीटर रस्ते तयार केले.-रोजगाराचा मार्ग असणार आहे-सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले.-चिपी विमानतळ सुरू होईल.- सी वर्ल्ड प्रकल्प येत्या दोन वर्षात काम सुरू करू.-सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ-कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकर मुक्त करू.-एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी २०२२ पर्यंत प्रयत्न

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे kankavli-acकणकवली