शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अखेर आंबा विक्रेत्यांना हटविले, सावंतवाडी नगरपरिषदेकडून कारवाई

By अनंत खं.जाधव | Updated: June 8, 2024 17:59 IST

पालकमंत्र्याची मुदत राहिली बाजूला : व्यापाऱ्यांकडून नाराजीचा सूर 

सावंतवाडी : भाजी मार्केटमध्ये आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी स्टॉल घालून बसणार्‍या विक्रेत्यांना आणखी दहा दिवसांची मुदत वाढवून देण्याबाबत एकमत झाले असतनाच अचानक शनिवारी सावंतवाडी पालिकेने कारवाईचा बडगा उचलल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला.आंब्याच्या हंगामात बाहेर बसण्यात परवानगी देण्यात आली होती, परंतु मुदत वाढवून देऊन सुद्धा पुन्हा व्यापारी ठाम राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे म्हणणे आहे. तर पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत व्यापार्‍यांत नाराजी असून आंबा हंगाम संपेपर्यंत किंवा वटपौर्णिमेनिमित्त तरी बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणीव्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यावर आंबा विक्रेत्यांना बसण्यास नगरपरिषदने परवानगी दिली होती. मुदत संपल्यानंतर त्यांना उठण्यास सांगितले. पण वटपौर्णिमेपर्यत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार दोनदा मुदत वाढवून देण्यात आली होती. तर गुरूवारी या विक्रेत्यांना उठण्यास सांगितले. पण ते ऐकत नव्हते शेवटी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सांगून ही कारवाई टाळली होती.पण मुदत वाढवून देण्या बाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याने तसेच मुदत वाढीच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याने शनिवारी मुख्याधिकाऱ्यांनी स्टॉल खाली करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. रस्त्यावर व्यापारासाठी बसणार्‍या सर्व व्यापाऱ्यांचे मार्केटमधील स्टॉल हटवणार आहोत, असे नगरपरिषदेच्या अधिकारी रचना कोरगावकर यांनी सांगितले.यावेळी काही व्यापाऱ्यांकडून याला विरोध करण्यात आला, मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्केटमधील स्टॉल हटविले. त्यामुळे लवकरात लवकर मार्केटमध्ये येऊन व्यापार करा अन्यथा तेथील सर्व स्टॉल हटवू अशी भूमिका नगरपरिषद कडून घेण्यात आली. याबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मार्केटमध्ये आंब्यांना ग्राहक येत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. अद्याप हंगाम संपला नाही, त्यामुळे आठ दिवसांची मुदत मागितली. मात्र पालिकेकडून आक्रमक भूमिका घेतली गेली असली तरी आम्ही पुढचे आठ दिवस इथेच व्यापारासाठी बसणार आहोत असे ते म्हणाले. यावेळी अनिल मठकर, विमल पावसकर, आरती मठकर, श्याम सांगेलकर, राजा खोरागडे, दिपाली राऊळ, सुलभा जामदार, सुषमा राऊळ, रेश्मा खोडागरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMarketबाजारSawantwadiसावंतवाडी