शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

मेढा ग्रामपंचायत खर्च संशयास्पद

By admin | Published: August 16, 2016 10:27 PM

वादाच्या भोवऱ्यात : खातेनिहाय चौकशीची मागणी

म्हापण : सन २0१५-१६ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील मेढा ग्रामपंचायतीचा जो खर्च दाखविण्यात आला आहे. तो संशयातीत असल्याने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेने हा खर्च अमान्य करून याला सर्वस्वी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याने या खर्चाची खातेनिहाय चैकशी करण्यात यावी तसेच दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेने बहुमताने मंजूर केल्याने पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात असलेली मेढा ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.१५ आॅगस्टची वार्षिक ग्रामसभा विठोबा कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसेवक चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत करून मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करताना सन २0१५-१६ चा तत्कालीन ग्रामसेवक तुषार हळदणकर यांनी मांडलेला खर्च सभेपुढे ठेवला असता त्यातील काही आक्षेपार्ह बाबींमुळे तो अमान्य करून त्याला जबाबदार असणारे ग्रामसेवक तुषार हळदणकर, सरपंच व सदस्य यांची खातेनिहाय चैकशी करण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच गौतम मालंडकर हे गेली सुमारे दोन वर्षे ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेला उपस्थित नसताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांच्या घरी जावून डिसेंबर २0१५ अखेर त्यांच्या सह्या प्रोसिडींगवर घेणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकांवर कारवाई करणे, ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील निवती बंदर ते पवार घर रस्त्याच्या दुतर्फा झाडी तोडणे, निवतीबंदर एस. टी. थांब्यावरील धोकादायक सुरुंची झाडे तोडणे, मेढा व श्रीरामवाडीतील सार्वजनिक शौचालये व अंगणवाड्यांची दुरूस्ती करणे, मेढा व श्रीरामवाडीतील धोकादायक बनलेल्या वीजवाहिन्या बदलणे, मेढा व श्रीरामवाडीचा जलशिवार योजनेत समावेश करणे, मेढा गावात दारूबंदी करणे, मेढावाडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदीस्त गटार बांधणे आदी महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले. (प्रतिनिधी)ग्रामस्थ नाराज : ग्रामपंचायत बरखास्तीची मागणीयापूर्वीच्या ग्रामसभेने घेतलेल्या ग्रामपंचायत बरखास्तीच्या ठरावाची कोकण आयुक्तांकडून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पण आता तीन ते चार महिने उलटूनही त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सभा संपेपर्यंत ग्रामस्थांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर सरपंच आरती कुडाळकर यांनी दिले नाही. सभा संपल्याचे जाहीर करण्यापूर्वीच सरपंच व काही सदस्य सभागृहातून निघून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता.