शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संजय राऊतांची पात्रता नाही - नितेश राणे 

By सुधीर राणे | Published: August 05, 2024 6:09 PM

कणकवली: चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हे अशाच पद्धतीचे ...

कणकवली: चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हे अशाच पद्धतीचे सडका आंबा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले आहे. आता कार्यतत्पर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १०० पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांना ७० आमदार सुद्धा निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे राजकारणातील सडका आंबा असलेल्या संजय राऊत यांची समाजाभिमुख काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांचे कार्य पहावे. विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण टीका करू नये. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी शरद पवार यांना अदानी बदलची आपली भूमिका स्पष्ट करायला सांगावी. उद्धव ठाकरे यांच्या  भूमिकेची दखल न घेण्याचे काम शरद पवार हे कृतीतून करत आहेत. यावर संजय राऊत यांनी बोलावे. त्यांना कधी तरी त्याबाबत जाब विचारावा...त्याचे पुरावे आता दाखवावे लागतीलउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सभागृहात फडणवीस यांनी आरोप केले होते. तेव्हा सचिन वाझे यांच्यावर करवाई करायला तो लादेन आहे का ?  असे उद्धव ठाकरे यांनी विचारून कोणतीच कारवाई केली नव्हती. सचिन वाझेंना कोण कुठे घेऊन फिरायचा त्याचे पुरावे मला आता दाखवावे लागतील.आमचे सरकार धारावीचा प्रकल्प पूर्ण करणार मुंबईला लुटण्याची हिम्मत कोणी करणार नाही. आमचे सरकार पुन्हा येणार आहे. ते धारावीचा प्रकल्प पूर्ण करणार आहे. मॅच फीक्सिंगचे आरोप राज ठाकरेंवर राऊत करीत आहेत. मात्र, राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. इस्लामिक देशात वक्फ बोर्डचा कायदा नाहीवक्फ बोर्डचा कायदा फक्त आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही इस्लामिक देशात हा कायदा नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी त्याबाबत चांगला निर्णय घेतील,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस