शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

मोतेंनी पगारवाढ नाकारली

By admin | Published: August 09, 2016 11:27 PM

शिक्षक पगाराविना : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा

आनंद त्रिपाठी --वाटूळ -शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यातील विधानसभा व विधान परिषद लोकप्रतिनिधींच्या वेतनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षक पगाराविना काम करत असल्याने आमदार रामनाथ मोते यांनी पगारवाढ नाकारली आहे.राज्यातील शिक्षण क्षेत्रामधील प्रलंबित समस्या तसेच अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याची घोषणा होऊनही प्रत्यक्ष अनुदान न मिळणे, उच्च माध्यमिक शाळांचा कायम शब्द काढल्याने या शाळांना अनुदान देण्याबाबत अद्याप निर्णय न घेणे, शिक्षकेतरांना देय असलेली आश्वासित प्रगती, योजनेचा लाभ न देणे, काम नाही तर वेतन नाही, असे तत्व लागू करुन कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवणे, शिक्षकांची भरती बंद करणे, अशा आर्थिक बाबींशी निगडीत अनेक समस्या असताना शासनाने आमदारांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जनक्षोभाला सामोरे जाणे अत्यंत अडचणीचे असून, शेवटी जनमत व सर्वसामान्यांच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत, असे सांगून बाप तुपाशी मुलगा उपाशी असे होता कामा नये. तसेच माझा सहकारी शिक्षक १० ते १५ वर्षे उपाशी असून, संसाराची होळी करून विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहे, असे असताना त्या शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून लाखो रुपयांचे वेतन घेणे, ही ‘प्रतारणा’ ठरेल, असे म्हणत कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी आपली पगारवाढ नाकारली आहे.शासनाने लोकप्रतिनिधींच्या पगारवाढीचा निर्णय एकमताने मंजूर केला आहे. या निर्णयानंतर जनतेतून संतापाची भावना व्यक्त होत आहे. जनतेचा प्रक्षोभ असूनही या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे दिसत आहे. मात्र, काही आमदारांनी ही पगारवाढ नाकारली असून, त्यामध्ये शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचा समावेश आहे.आमदार रामनाथ मोते यांच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकांचा सर्वसामान्य नेता असे ब्रीद असलेल्या मोतेंबद्दलचा आदर आणखीनच वाढला, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली.सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांचे वेतनवाढ करण्याचा ठराव संमत केला. एरव्ही सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्षनेतेदेखील या बाजूने होते.आमदारांचे वेतन ७५ हजारांवरून थेट १ लाख २५ इतके करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वेतनवाढ केल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.राज्यातील अनेक शिक्षक तूटपुंज्या पगारावर काम करत आहेत. त्यांच्या कामाचा मोबदला देताना संकुचित वृत्ती बाळगली जात आहे. पगारवाढ सोडा; पण त्यांना बेरोजगार केले जात आहे.