शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

आंबा व्यवसायिकावरची नगरपरिषदची कारवाई टळली; आणखी दहा दिवसांची मुदत

By अनंत खं.जाधव | Updated: June 7, 2024 23:09 IST

पालकमंत्र्याकडून मध्यस्थी, सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये नगरपरिषद कडून जागा देण्यात आली आहे, परंतु आंब्याच्या हंगामात त्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी देण्यात आली होती 

सावंतवाडी : येथील बाजारपेठेत आंबे घेवून रस्त्यावर बसणाऱ्या ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांसह स्थानिकांना हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली, मात्र त्या ठिकाणावरून आम्ही आणखी १० दिवस हलणार नाही, अशी भूमिका या आंबा व्यापाऱ्यांनी घेतल्याने  थोडा गोंधळ निर्माण झाला होता.

याबाबत माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना आणखी दहा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवरची टांगती तलवार सध्यातरी बाजूला झाली आहे. सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये नगरपरिषद कडून जागा देण्यात आली आहे, परंतु आंब्याच्या हंगामात त्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र ही मुदत पालिकेने २ वेळा वाढवून दिलेली होती ती आता संपली असल्याने त्यांना पुन्हा आपल्या जागेत जावे, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या. त्यानुसार त्यांना हटवण्याची कारवाई शुक्रवार सकाळपासूनच हाती घेण्यात आली होती.

यावेळी त्या ठिकाणी आलेल्या नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांना व्यापाऱ्यांनी कारवाई पासून रोखले तसेच अद्याप पर्यंत आंब्याचे उत्पन्न सुरू आहे. त्यामुळे आणखी १० दिवस आम्हाला रस्त्यावर बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली मात्र काही झाले तरी आम्ही तुम्हाला मुदत वाढवून देणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाकडून घेण्यात आली. तसेच व्यापाराने सहकार्य न केल्यास तुमचे सामान जप्त करू असा इशारा दिला.

दरम्यान याबाबत तेथील व्यावसायिकांनी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, भाजपचे नेते विशाल परब यांच्याशी संपर्क साधून याबाबतची कल्पना दिली. तसेच काही झाले तरी आणखी १० दिवस आम्हाला बसण्यासाठी मुभा द्या अशी मागणी केली. त्यानुसार विशाल परब यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधला, त्यांना १० दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांना १० दिवसाची मुदत वाढवून देण्यात आल्याचे निरवडेकर यांनी सांगितले. 

यावेळी सुलभा जामदार, अमित मठकर संगिता नार्वेकर, विमल पावसकर, राजा लाखे, प्राजक्ता सांगेलकर, दिपिका मठकर, नियोजिता शृंगारे, शेरीन राॅडीक्स, रूपा गोवेकर, आदी व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला आंब्याचा हंगाम संपेपर्यंत बसण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.