शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Narayan Rane: आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नको, हे फक्त पोस्टर लावायच्या लायकीचे; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:00 IST

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व सिद्ध करत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सिंधुदुर्ग-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व सिद्ध करत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कायद्याचा, पोलिसांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारनं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ज्यांना अक्कल आहे अशा लोकांनाच सत्ता मिळाली आणि अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला, असा खोचक वार करत नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही नारायण राणे म्हणाले. 

आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाआता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी 'लगान' टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला. 

पोस्टरबाजीवरही साधला निशाणानितेश राणे हरवले आहेत अशी पोस्टरबाजी मुंबईत सुरू असल्याचं राणे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. "शिवसेनेचे लोक फक्त पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत. आता त्यांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन राज्यभर पोस्टर लावत फिरावेत. आम्ही जनतेच्या विकासाचं राजकारण करू", असं राणे म्हणाले. 

सगळ्यांना पुरून उरलोय"नारायण राणेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना सणसणीत उत्तर मिळालं आहे. तीन पक्ष एकत्र येऊन लढले तरी भाजपाची सत्ता आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आली आहे. इथल्या जनतेनं भुरट्यांच्या हातात सत्ता जाऊ दिली नाही. नारायण राणे एवढ्या वर्षात सगळ्यांना पुरुन उरलाय आणि केंद्रात पोहोचलाय. मध्येच कुठे थांबलेला नाही", असंही नारायण राणे म्हणाले.   

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग