शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

राज्यात एक लाख मराठा उद्योजक निर्माण करणार : नरेंद्र पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 16:21 IST

महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी जामिनाची आवश्यकता नाही.

सिंधुदुर्ग : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फतमराठा समाजाच्या तरुणांना देण्यात येणारे कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी जामिनाची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करतानाच 'एक मराठा, लाख मराठा' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या महामंडळामार्फत राज्यात एक लाख मराठा उद्योजक निर्माण करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाच्या योजनांचा मेळावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, मराठा युवकांना स्वयंरोजगाराचे दालन खुले करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळास भरघोस निधी देऊन राज्य सरकारने पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करन दिली आहे. या मंडळामार्फत ३ योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा दौऱ्यावर येऊन आपण या महामंडळाच्या योजनेचा आढाव घेतला असता जिल्ह्यात या योजना प्रचार झाला नसल्याचे दिसून आले . केवळ २९८ लोकांनी सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) महामंडळाकडून घेतले आहे. यात ५३ लोकांना कर्ज मंजूर झाले असून ५१ जणांना व्याज परतावा सुरु झाला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे लाभाथ्यांशी चर्चा करताना, कर्ज देताना बँकांकडून सरकारी जामीनदार हवा अशी सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र, या महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी जामिनाची आवश्यकता नाही. तशा सूचना सर्व बँकांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात महामंडळाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांत तालुकावार नियोजन करून लाभार्थी संख्या वाढविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी एक जिल्हा समन्वयक देण्यात आला आहे. जसजसे लाभार्थी वाढत जाणार तसे समन्वयकही जास्त दिले जाणार आहेत. 'एक मराठा, लाख मराठा' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजाच्या तरुणांना कर्ज देऊन राज्यात एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्यात येणार आहेत, असे यावेळी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.